मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांनी विविध मुलाखतींमध्ये दिलेली वक्तव्ये हे सोशल मीडियावर भलतीच गाजताना दिसतात. त्यांची वक्तव्ये ऐकल्यानंतर लोकांची त्या व्हिडीओखाली असलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी घाई होताना दिसते. सचिन पिळगावकरांना 'महागुरू'असे टोपणनाव देण्यात आलेले आहेत. या टोपणनावापासून अत्यंत वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने टीका,टीपण्णी करण्याची नेटकऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते. सचिन पिळगावकर यांनी नुकतेच एक विधान केले होते, ज्यात त्यांनी दावा केला होता की त्यांनी शोले चित्रपटामध्ये गब्बर सिंगची भूमिका करणाऱ्या अमजद खान यांना डायलॉगफेक कशी असायला हवी याचं मार्गदर्शन केलं होतं. (Sachin Pilgaonkar taught Amjad Khan dialogue delivery )अनेकांसह राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही ही बाब अजिबात पटली नाही.
(नक्की वाचा : नात्यांची वीण नव्याने जुळणार, प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार! तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेचा प्रोमो)
नेमकं घडलं काय? (Sholay movie dialogue delivery controversy)
जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करत सचिन पिळगावकर यांनी केलेले विधान आपल्याला अजिबात पटले नसल्याचे म्हटले होते.(Jitendra Awhad's disbelief over Pilgaonkar's claim) आम्ही त्यांच्याकडून याबद्दलची सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी म्हटले की, मी शोले चित्रपट किमान 50 वेळा बघितला आहे. गब्बरसिंग याची भूमिका अमजद खान यांनी अजरामर केली. त्याने रंगवलेल्या भूमिकेला तोडच नाही. अमजद खानच्या घरात चित्रपटसृष्टी होती. अमजद खान यांचे वय तेव्हा होते 35 आणि सचिन पिळगावकरांचे वय होते 15. त्यांनी अमजद खान यांना डॉयलॉग कसे फेकायचे हे सांगणं थोडे अति वाटते.
(नक्की वाचा: काम मिळत नसल्याने मराठी अभिनेत्याने आयुष्य संपवलं, सिनेविश्व हादरलं)
आव्हाड यांनी म्हटले की, अमजद खानना सचिन पिळगावकरांनी शिकवावं इतके काही अमजद हे खालच्या दर्जाचे कलाकार नव्हते. मला जे पटलं नाही ते मी बोलणार. सचिन यांचं हे बोलणं मला पटलंच नाही, पचनीच पडलं नाही. आव्हाड यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्यांना अनेकांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. राजकारण्यांनी अशा विषयावर का बोलावे असा प्रश्न विचारत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. याबद्दल बोलताना आव्हाड यांनी म्हटले की, राजकीय पक्षांनी सगळ्या विषयांवर भाष्य करावं. चुकीची माहिती समाजात जात असेल तर त्यावर का बोलू नये?