जाहिरात

Randeep Hooda: वाटीत लघुशंका करायला लावली! रणदीप हुडाला करायला लावले चित्र-विचित्र विधी

Randeep Hooda Meitei Wedding Tradition: रणदीप हुडाने लिन लैशरामशी लग्न झालं असून नोव्हेंबर 2023 या दोघांनी विवाह केला होता. मैतई पद्धतींनुसार या दोघांचे लग्न झाले होते. रणदीपने मैतेई विवाहपद्धतीतील चित्र-विचित्र गोष्टींबद्दल पहिल्यांदाच माहिती दिली आहे.

Randeep Hooda: वाटीत लघुशंका करायला लावली! रणदीप हुडाला करायला लावले चित्र-विचित्र विधी
मुंबई:

'स्वातंत्र्यवीर सावरकर' असो अथवा नुकताच प्रसिद्ध झालेल्या 'जाट' चित्रपट असो, बॉलीवूडमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुडाने आपल्या अभिनय कौशल्याने प्रभावित केले होते. रणदीप हुडाने लिन लैशरामसोबत लग्न केलं असून त्यांच्या लग्नाला 2 वर्षे होणार आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये या दोघांनी मैतेई रिती-रिवाजानुसार लग्न केलं होतं. रणदीपची बायको लिन ही ही मणिपूरच्या इंफाळची राहणारी आहे. आपल्या लग्नाच्यावेळी कराव्या लागलेल्या चित्र-विचित्र चालीरितींबद्दल रणदीपने सांगितले असून यातल्या काही चालिरीती या विचित्र स्वरुपाच्या आहेत. रणदीपने सांगितले की त्याला लग्नाच्यावेळी एका वाटीमध्ये लघवी करायला सांगितली होती.  

(नक्की वाचा : Anupamaa Set Fire: गोरेगाव फिल्मसिटीत अग्नितांडव! 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक)

एका इंग्रजी दैनिकाला रणदीपने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये रणदीपने म्हटले की, लग्नविधींसाठी मला एक सहाय्यक देण्यात आला होता जो मला माहिती देत होता. लग्नामध्ये नवऱ्यामुलाला अत्यंत सभ्य दिसणे गरजेचे असते. एका खोलीमध्ये नवऱ्या मुलाला आणण्यात येते आणि तिथे लग्नासाठी आलेली सगळी मंडळी नवऱ्या मुलाला येऊन पाहात असतात. लग्नविधीला जात असताना नवऱ्या मुलाला एक छत्री आणि एक वाटी दिली जाते. ती घेऊन या खोलीमध्ये जावं लागतं. लग्नासाठी डोक्याला पगडीसारखं एक वस्त्र बांधलं जातं. हे वस्त्र बांधल्यानंतर मान खाली करण्यास मनाई असते. डोक्यावर हे वस्त्र बांधलं की नवऱ्या मुलाने लग्न होईपर्यंत ताठ राहायचं असतं. 

(नक्की वाचा: अभिषेक बच्चन, संजय कपूर नाही तर करिश्माला या हीरोने लावलं होतं याड)

मंडपात स्थिर बसावं लागतं 

रणदीपने पुढे सांगितलं की मंडपात आल्यानंतर लग्न लावणाऱ्या व्यक्ती मंत्र म्हणायला सुरुवात करतात आणि वऱ्हाडी दाम्पत्यावर मीठ टाकतात. हा विधी सुरू असताना कोणतीही हालचाल करता येत नाही. मंडपात जर नवरा मुलगा सुस्तावून बसला तर त्याच्यासोबतचा मदतनीस त्याला हटकतो आणि सरळ बसण्यास सांगतो. नवऱ्या मुलाने छान, सभ्य दिसणं गरजेचं असतं कारण नवरामुलगा हा देवासमान असतो. त्यामुळे संपूर्ण लग्नविधी होईपर्यंत खांबासारखं ताट बसावं आणि उभं राहावं लागतं.  

लघवीसाठी वाटी दिली 

नवऱ्या मुलाला हातामध्ये एक वाटी दिली जाते. ही वाटी कशासाठी असं रणदीपने विचारलं असता त्याला सांगण्यात आलं की त्यामध्ये तुला लघुशंका करायची आहे. जोराची लघवीला लागली तर छत्री उघडायची आणि त्याचा आडोसा घेऊन वाटीमध्ये लघवी करायची असते, त्यासाठीच या दोन गोष्टी दिल्या जातात असे रणदीपने सांगितले.  लग्न घरातून, मंडपातून नवरा मुलगा बाहेर जाऊ शकत नाही कारण तो देवासमान असतो. त्यामुळे जर लघवी लागली तर ही सोय करून देण्यात आलेली असते. रणदीपने सांगितले की लिन जेव्हा लग्नमंडपात आली तेव्हा तिच्यासोबतही एक मदतनीस होता. ती हसत होती आणि तिला मदतनीसाने हसायचं नाही असा दम भरला होता. लग्नमंडपात हसायचं नसल्याने तो हा दम देत होता.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com