लग्नसोहळ्यामध्ये लाल रंगाचा लेहंगा परिधान करणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. पण हे स्वप्न त्या गावासाठी श्राप ठरले होते, जेथे नववधू पालखीत बसताच अचानक गायब होत असे. परिणामी मुली लाल रंगाचा लेहंगा परिधान करायला घाबरत असत. पण तुम्ही चिंता करू नका ही घटना खऱ्या जीवनातील नाहीय तर 1979मधील रील लाइफमध्ये आहे. 'जानी दुश्मन' असे सिनेमाचे नाव होते, ज्यामध्ये मोठमोठ्या कलाकारांचा समावेश होता. सिनेमामध्ये ज्वाला प्रसाद या व्यक्तिरेखेच्या अवतीभोवती फिरणारी कथा सिनेरसिकांना पाहायला मिळाली, ज्याला त्याच्या स्वप्नातील मुलीशी लग्न करण्याची इच्छा होती. लग्नाच्या दिवशी त्याची पत्नी लाल रंगाचा लेहंगा परिधान करते आणि दुधामध्ये विष मिसळून त्याची हत्या करते. यानंतर तो राक्षस बनतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यानंतर तो बदला घेण्याचे ठरतो आणि लाल रंगाच्या लेहंगा परिधान करणाऱ्या प्रत्येक नववधूचे अपहरण करुन त्यांची जीव घेण्यास सुरुवात करतो. पण एकदा ज्वालाचा एका नवऱ्यामुलासोबत सामना होतो, यावेळेस ज्वाला त्याला मारतो आणि त्याच्या शरीरावर ताबा मिळवतो. यानंतर एकापाठोपाठ एक नववधूंना मारण्याची मालिका सुरू होते. पण कोणाला कशाचाही थांगपत्ता लागत नाही. गावातील पुजाऱ्यासह कित्येक लोकांवर शंका व्यक्त केली जाते. अखेर राक्षसाचा शोध लावून त्याचा खात्मा केला जातो.
(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)
(नक्की वाचा: परेश रावल यांनी सांगितला मराठी माणूस आणि त्याच्या ताकदीचा किस्सा)
'जानी दुश्मन' सिनेमाचा लोकप्रिय सिनेमांच्या यादीमध्ये समावेश आहे. सिनेमातील 'चलो रे डोली उठाओ कहार' आजही तितकेच लोकप्रिय आहे. हा सिनेमा दीड कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, त्यावेळेस सिनेमाने नऊ कोटी रुपयांची कमाई केली होती. सुपरस्टार जितेंद्र, सुनील दत्त, प्रेमनाथ, शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा, रीना रॉय, नीतू सिंग, रेखा, योगिता बाली, बिंदिया गोस्वामी, रझा मुराद, सारिका, अमरीश पुरी, शक्ती कपूर आणि अरुणा इराणी यासारख्या कलाकारांचा सिनेमामध्ये समावेश होता.