जाहिरात

Gautam Adani News: 'भारत शांतताप्रिय, पण कुणी डोळे दाखवाल तर...', गौतम अदाणींचे ऑपरेशन सिंदूरवर भाष्य

Gautam Adani On Operation Sindoor: अदाणी समूहाची पुढील वाटचाल, ध्येय धोरणांसह देशाची सुरक्षा, ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या जागतिक स्थितीबद्दल भाष्य केले. 

Gautam Adani News: 'भारत शांतताप्रिय, पण कुणी डोळे दाखवाल तर...', गौतम अदाणींचे ऑपरेशन सिंदूरवर भाष्य

Annual General Meeting of Adani Group: अदाणी समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (मंगळवार, ता. 24 जून) पार पडली. या सभेत अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी गुंतवणूकदारांना संबोधित केले. अदाणी समूहाची पुढील वाटचाल, ध्येय धोरणांसह देशाची सुरक्षा, ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या जागतिक स्थितीबद्दल भाष्य केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले गौतम अदाणी?

गौतम अदाणी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या शूर सैनिकांनी दाखवून दिले की ते दिखाव्यासाठी किंवा पदकांसाठी उभे नाहीत ते फक्त आणि फक्त त्यांच्या कर्तव्यासाठी उभे आहेत. भारत शांततेचे महत्त्व समजतो, परंतु जर कोणी डोळे दाखवले तर त्याच्याच भाषेत त्याला कसे उत्तर द्यायचे हे देखील भारताला माहित आहे."

यावेळी बोलताना गौतम अदाणी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये अदाणी डिफेन्सने केलेल्या योगदानाचाही उल्लेख केला. अदाणी डिफेन्सचा विचार केला तर ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हाला बोलावले आणि आम्ही ती जबाबदारी पार पाडली. आमचे ड्रोन आकाशातील सैनिकांची दृष्टी बनले आणि हल्ला करण्यासाठी तलवार देखील बनले. आमच्या ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाने आमच्या सैनिकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत महत्त्वाची भूमिका बजावली, असं ते म्हणाले. 

अदाणी एअरपोर्ट आणि इंडिगोची संयुक्त घोषणा, NMIA खुले होताच पहिल्या दिवसापासून इंडिगोची विमाने झेपावणार

वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढे बोलताना गौतम अदाणी म्हणाले की, "मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा युरोपच्या ऊर्जा आणि रसद पुरवठ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. आर्थिक आघाडीवर युरोपचा आत्मविश्वास कमकुवत झाला आहे. अमेरिका देखील त्याच्या आव्हानांना तोंड देत आहे. परंतु या सर्व गोंधळातही भारत मजबूत उभा आहे आणि सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. हा योगायोग नाही. हे आमच्या चांगल्या धोरणांचे परिणाम आहेत. मी पूर्ण आत्मविश्वासाने म्हणतो की केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारांनी एकत्रितपणे खऱ्या बदलासाठी एक मजबूत पाया रचला आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com