
F-16 downed Air Chief on Operation Sindoor: भारताचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी 'ऑपरेशन सिंदूर' बाबत एक मोठा खुलासा केला. या कारवाईत भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानची 4 ते 5 F-16 आणि JF-17 फायटर जेट्स पाडली. 'पाकिस्तान आपले दहशतवादी तळ खैबर पख्तूनख्वा येथे हलवत आहे, पण तिथेही त्यांना लक्ष्य करण्याची (hit) आमची क्षमता आहे,' असा स्पष्ट इशाराही एअर चीफ यांनी दिला. S-400 आणि LCA मार्क 1 A च्या खरेदीसह 'पुढची लढाई खूप वेगळी असेल' असे सांगत त्यांनी भविष्यातील तयारीवर भर दिला
काय म्हणाले Air Chief?
भारताचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल यांनी शुक्रवारी या विषयावर बोलताना सांगितलं की, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आम्ही पाकिस्तानची 4-5 F-16 लढाऊ विमाने पाडली. पाकिस्तानची चीनमध्ये तयार झालेली जेएफ-17 (JF-17) फायटर जेट्सही पाडण्यात आली. या कारवाईदरम्यान पाकिस्तानचे अनेक हवाई तळ (Air Field) उद्ध्वस्त झाले. धावपट्टी (Runway) आणि हँगर (Hangar) निकामी झाले.
पाकिस्तानने राफेलबद्दल केलेल्या दाव्यांवर वायुसेना प्रमुख म्हणाले की, 'जर त्यांचे म्हणणे असेल की आमची 15 विमाने पाडली, तर मी त्यावर काहीही बोलणार नाही. तुम्ही असा एकही फोटो पाहिला आहे का? ती नुसतीच मनोरंजक कथा आहे, त्यांच्या जनतेला (Public) खूश ठेवण्यासाठी त्यांना बोलू द्या.'
( नक्की वाचा : Exclusive Video : IAF चा मोठा खुलासा: 'ऑपरेशन सिंदूर'च्या हल्ल्यांचे नवे व्हिडिओ NDTV डिफेन्स समिटमध्ये जारी )
F-16 आणि JF-17 फायटर जेट्स पाडली
एअर चीफ म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की पाकिस्तान दहशतवादी संघटनांना खैबर पख्तूनख्वा येथे हलवत आहे. पण आमच्याकडे तिथपर्यंत मारा करण्याची क्षमता (strike capability) आहे. आम्ही त्यांना तिथेही नष्ट करू. एअर चीफ म्हणाले की, पाकिस्तानची 10-12 विमाने नष्ट झाली आहेत, त्यापैकी 4 ते 5 F-16 फायटर जेट्स आहेत. यापैकी काही फायटर जेट्स हँगरमध्ये होती, तर काही उड्डाण करत होती. याव्यतिरिक्त, एक C-130 (कार्गो विमान) जमिनीवर आणि एक अवाक्स (AWACS) (निगरानी विमान) देखील नष्ट करण्यात आले.
S-400 ची आणखी गरज
वायुसेना प्रमुख म्हणाले, S-400 (क्षेपणास्त्र प्रणाली) ने चांगले काम केले आहे, त्यामुळे त्याची अजून गरज आहे. सुखोई 30 (Sukhoi 30) विमानांचे अपग्रेडेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात रशियाचा (Russia) देखील सहभाग आहे. चीन आपली तयारी करत आहे, तर आम्हीही करत आहोत. नवीन हवाई तळ (Air Base) देखील तयार होत आहेत. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. जैश (Jaish) आणि लष्कर (Lashkar) या दहशतवादी संघटनांचे तळ पाकिस्तानच्या खैबर पख्तून भागात बदलणे हे लाजिमी (inevitable) आहे. जर गुप्तचर माहिती (Intelligence) उपलब्ध असेल, तर आम्ही त्यांना तिथे लक्ष्य (hit) करू शकतो.
( नक्की वाचा : 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण )
पुढील लढाई वेगळी
एअर चीफ ए.पी. सिंग (A P Singh) यांनी यावेळी सांगितलं की, 'पुढची लढाई पूर्वीच्या लढायांपेक्षा खूप वेगळी असेल. आम्हाला सध्या तयार राहायचे आहे आणि भविष्यासाठी देखील तयारी करायची आहे. आपल्याला महाशक्ती (Super Power) बनायचे असेल, तर आत्मनिर्भरता (Self-reliance) खूप महत्त्वाची आहे. LCA मार्क 1 A ची ऑर्डर दिली गेली आहे. 2028 पर्यंत त्याची खेप (delivery) मिळू शकते.'
भविष्यातील लढाईत सर्वांनी एकत्रितपणे (jointly) काम करावे लागेल. 'ऑपरेशन सिंदूर'मधून धडा (lesson) घेऊन सर्व यंत्रणांमध्ये सामूहिक विचारांसह (collective thinking) पुढे जावे लागेल. 'ऑपरेशन सिंदूर'ने भारताच्या हवाई सामर्थ्याची (Air Power) ताकद दाखवली आहे. वायुसेनेकडून हे वचन आहे की, जेव्हाही गरज पडेल, तेव्हा आम्ही कर्तव्य (duty) बजावू. थिएटर कमांडला घेऊन कोणतेही मतभेद नाहीत, त्यावर विचार सुरू आहे.
आम्हाला आमच्या अनुभवाच्या आधारावर संयुक्त कारवाई (Joint Action) करायची आहे. आम्हाला क्षमतावान विमाने (Aircraft) पाहिजेत. आम्हाला एलसीए (LCA) देखील पाहिजे. आम्ही डीआरडीओ (DRDO) आणि एचएएल (HAL) सोबत काम करत आहोत. जिथे तंत्रज्ञानाच्या (technology) बाबतीत आम्ही मागे असू, तिथे रणनीती बनवून कोणासोबत तरी सहकार्य करावे लागेल.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world