
MSP News : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमालाला अधिक दर मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी एमएसपीमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजरबियाणे) (प्रति क्विंटल ८२० रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल ५९६ रुपये), कापूस (प्रति क्विंटल ५८९ रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल ५७९ रुपये) करण्याची शिफारस केली आहे.
नक्की वाचा - Fishermen News: मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद, महिला मच्छीमारांना होणार फायदा
खरीप पिकांचे २०२५-२६ साठीचे हमीभाव
- कापूस मध्यम धागा - ७७१० रुपये (५८९ रुपयांची वाढ)
- कापूस लांब धागा - ८११० रुपये (५८९ रुपयांची वाढ)
- सोयाबीन - ५३२८ रुपये (४३६ रुपयांची वाढ)
- तूर - ८००० रुपये (४५० रुपयांची वाढ)
- मका - २४०० रुपये (१७५ रुपयांची वाढ)
- ज्वारी हायब्रीड- ३६९९ रुपये (३२८ रुपयांची वाढ)
- ज्वारी मालदांडी- ३७४९ रुपये (३२८ रुपयांची वाढ)
- भात सामान्य - २३६९ रुपये (६९ रुपयांची वाढ)
- भात ए ग्रेड- २३८९ रुपये (६७ रुपयांची वाढ)
- बाजरी- २७७५ रुपये (१५० रुपयांची वाढ)
- रागी - ४८८६ रुपये (५९६ रुपयांची वाढ)
- मूग - ८७६८ रुपये (८६ रुपयांची वाढ)
- उडीद- ७८०० रुपये (४०० रुपयांची वाढ)
- भूईमूग- ७२६३ रुपये (४८० रुपयांची वाढ)
- सूर्यफूल- ७७२१ रुपये(४४१ रुपयांची वाढ)
- तीळ- ९८४६ रुपये (५७९ रुपयांची वाढ)
- कारळे - ९५३७ रुपये (८२० रुपयांची वाढ)
(नक्की वाचा- Amravati News : मेळघाटातील योजना बारगळल्या, भीषण पाणीटंचाई; 11 गावात दररोज 20 टँकरने पाणीपुरवठा)
भाड्याने घेतलेले मानवी श्रमाची किंमत , बैल मजूरी/यंत्र कामगार, भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क, अवजारे आणि शेतीच्या इमारतींवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालविण्यासाठी डिझेल/वीज इत्यादी, विविध खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचे मूल्य, या सर्व चर्चांना विचारात घेऊन किंमतीत वाढ करण्यात आली आहे.