पाकिस्तानने गुरुवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जम्मूपासून जैसलमेरपर्यंत लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने हे सगळे हल्ले फोल ठरवले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानची F-16 आणि JF-17 यासह एकूण 4 विमाने पाडली असून 8 मिसाईल आणि अनेक ड्रोनही पाडले आहेत. पाकिस्तानच्या या कुरापती कृत्यांचा भारत चांगला धडा शिकवताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकीकडे भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यास सुरुवात केलेली असताना दुसरीकडे बलुच लेखक मीर यार बलोच यांनी बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. बलुचिस्तानची गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या जोखडातून मुक्तता मिळावी अशी मागणी असून बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा यासाठी शस्त्र उचलणाऱ्यांनी अनेकदा पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य केले आहे. बलुचिस्तानी नेत्यांनी पाकिस्तान्यांना तत्काळ आमचा देश सोडून निघा असा इशाराही दिला आहे. या व्यतिरिक्त गुरुवारी रात्रीपासून आतापर्यंत काय घडलं त्यावर नजर टाकूयात.
नक्की वाचा : तणावाचे रुपांतर आण्विक युद्धात होऊ नये अशी आशा! चर्चेद्वारे वाद मिटवण्याचा अमेरिकेचा सल्ला
- LOC जवळ स्फोट, जम्मूत संपूर्ण ब्लॅकआऊट
- भारत सरकारने दिलेल्या आदेशानंतर X ने 8 हजार खाती बंद करण्याचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानने PSL चे उरलेले सगळे सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला.
- शुक्रवारी पहाटे जम्मू कश्मीरमध्ये पूंछ, राजौरीमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले
- भारत-पाकिस्तानमधील तणावात अमेरिका पडणार नाही, चर्चेने प्रश्न सोडवला जावा जेडी वान्स यांचे विधान
- भारत आणि पाकिस्तानातील तणाव आण्विक युद्धाचे रुप घेऊ नये अशी आशा करतो, जेडी वान्स यांचे विधान
- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव तत्काळ कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले
- भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला.
- भारताने पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्या.
- त्यानुसार भारतानेही पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला
- भारताने आधीच बजावले होते, कुरापत काढल्यास सोडणार नाही
- पंजाबच्या पठाणकोट, अमृतसर, जालंधर, होशियारपूर, मोहालीसह चंदीगडमध्ये गुरुवारी ब्लॅकआऊट केला
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक बोलावली, शुक्रवारी म्हणजे आज होणार बैठक
- पंजाबमधील शाळा, कॉलेजना पुढील तीन दिवस सुट्टी, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या.
- सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न BSF ने हाणून पाडला.
- भारताच्या हवाई हल्ला प्रतिरोधक प्रणालीने सगळे हल्ले फोल ठरवले
- जम्मूतील सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अरनिलातील गावांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला
- अखनूर, सांबा, बारामुल्ला और कुपवाडा इथे स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर सायरन वाजू लागले
- भारताने पाकिस्तानची 4 विमाने आणि 8 ड्रोन पाडले
- मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न
- जम्मू, पठाणकोट, उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न
- पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला.