जाहिरात

Pahalgam Attack: दहशतवाद्यांच्या 'अशा' नांग्या ठेचल्या! सुरक्षा दलाची मोठी कारवाई, थेट बॉम्बने

शुक्रवारी, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल आणि आसिफ यांची घरेही लष्कराने आयईडी स्फोटांद्वारे उद्ध्वस्त केली.

Pahalgam Attack: दहशतवाद्यांच्या 'अशा' नांग्या ठेचल्या! सुरक्षा दलाची मोठी कारवाई, थेट बॉम्बने

काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराचा हल्ला सुरूच आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांची आणखी दोन घरे लष्कराने उद्ध्वस्त केली आहेत. या दहशतवाद्यांची घरे पुलवामाच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी, पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल आणि आसिफ यांची घरेही लष्कराने आयईडी स्फोटांद्वारे उद्ध्वस्त केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेत प्रशासनाने काल रात्री दोन सक्रिय दहशतवाद्यांची घरे पाडली. ही कारवाई शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यात करण्यात आली. पहिली कारवाई शोपियान जिल्ह्यातील छोटीपोरा गावात करण्यात आली, जिथे सक्रिय लष्करए-तैयबा कमांडर शाहिद अहमद कुट्टे यांचे घर पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. शाहिद गेल्या 3-4 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे आणि अनेक देशविरोधी कटांमध्ये सहभागी आहे.

दुसरी कारवाई कुलगाम जिल्ह्यातील मातालाहामा भागात करण्यात आली, जिथे रात्री सक्रिय दहशतवादी जाहिद अहमदचे घर पाडण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवाद्यांवर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि सुरक्षा यंत्रणा बऱ्याच काळापासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या. ही कारवाई दहशतवादी नेटवर्क कमकुवत करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल मानले जात आहे.

ट्रेंडिग बातमी - Pahalgam attack: भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर जगाचा पाठिंबा कुणाला? अमेरिका, रशिया, चीन कुणाच्या बाजूनं?

दरम्यान, पुलवामा येथील मुरान भागात झालेल्या स्फोटात तिसऱ्या दहशतवादी अहसान उल हकचे घर जमीनदोस्त झाले. अहसान 2018 मध्ये पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्यानंतर परतला आणि पहलगाम हल्ल्यातील संशयित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही दहशतवाद्यांवर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि सुरक्षा एजन्सी बऱ्याच काळापासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या. ही कारवाई दहशतवादी नेटवर्क कमकुवत करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल मानले जात आहे.

ट्रेंडिंग बातमी - Exclusive: देश सुरक्षित हातात, मग अशा घटना का होतात? वीर योद्धे नायक दीपचंद यांचा क्रोध