जाहिरात

Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक

अशफाक आणि इतरांनी बारडोलीतील अकोटी गावात भाड्याने एक आंब्याची बाग घेतली होती. त्यावर सुरेश वर्मा आणि आणखी एका गावकऱ्याला मजूर म्हणून कामावर ठेवले होते.

Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक
Accused suspected that the victim had stolen mangoes worth Rs 50,000. (Representational)

आंबे चोरीच्या संशयावरुन शेतमजुराची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  गुजरातच्या सुरत जिल्ह्यात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. तब्बल दोन आठवड्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोमवारी पाच जणांना अटक करण्यात आली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींनी सुरेश वर्मा (वय 48 वर्ष) यांच्यावर क्रूरपणे हल्ला करत त्यांची हत्या केली.  त्यानंतर त्यांचा मृतदेह 21 मे रोजी कालव्यात फेकून दिला. अशफाक रायन, विनोद अग्रवाल, मोहम्मद उमर, दशरथ मौर्य आणि याकूब अब्दुल गफ्फार यांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

अशफाक आणि इतरांनी बारडोलीतील अकोटी गावात भाड्याने एक आंब्याची बाग घेतली होती. त्यावर सुरेश वर्मा आणि आणखी एका गावकऱ्याला मजूर म्हणून कामावर ठेवले होते. अलीकडेच, आरोपींना संशय आला की वर्मा यांनी शेतातून 50 हजार रुपयांचे आंबे चोरले होते आणि ते बाजारात विकले.

(नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके)

यावरुन आरोपींनी 21 मे च्या रात्री वर्मा यांना शेतातील एका झाडाला बांधले आणि त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. नंतर अशफाक यांनी वर्मा यांच्या पत्नीला फोन करून आंबे चोरून केलेल्या नुकसानासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. मारहाणीमुळे वर्मा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, आरोपींनी मृतदेह त्यांच्या कारमध्ये नेला आणि कामरेज तालुक्यातील एका कालव्यात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सुरेश वर्मा घरी परतले नाही तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी बारडोली पोलिसांकडे संपर्क साधला आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तसेच अशफाकने 50 हजार रुपयांची मागणी केल्याचेही पोलिसांना सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

(नक्की वाचा- Nitesh Rane: मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होण्याच्या हालचालींना वेग, 'इतक्या' मिनिटात गाठता येणार नवी मुंबई)

त्यानंतर पोलिसांना सुरेश वर्मा यांचा शोध सुरु केला. त्यावेळी पोलिसांना कालव्यातून एक अनोळखी मृतदेह आढळून आला. सुरेश वर्मा यांच्या मृतदेहाची कुटुंबीयांनी ओळख पटवली. त्यानंतर, 31 मे रोजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com