
17 वर्षांनंतर आयपीएल जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने इतिहास रचला. मात्र या विजयाच्या जल्लोषादरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर कर्नाटक सरकार, बंगळूरु प्रशासन, बीसीसीआय, आयपीएल व्यवस्थापन आणि आरसीबी संघ व्यवस्थापन यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून दिली आहे. या 11 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, याबद्दल स्पष्ट उत्तर देण्यास कोणीही तयार नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
NDTV ने या घटनेचा सखोल अभ्यास केला. या जीवघेण्या जल्लोषातील 11 दोषींचा शोध घेतला आहे.
1. बंगळूरु स्थानिक प्रशासन
कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्यास सर्वप्रथम स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असते. या दृष्टीने, एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत बंगळूरु प्रशासनाची मोठी चूक मानली जात आहे. खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि व्हीव्हीआयपी यांच्या सुरक्षेवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले. परंतु स्टेडियम आणि आजूबाजूला जमलेल्या प्रचंड गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नव्हते.
2. आरसीबी फ्रँचायझी आणि सरकार
पोलिसांनी आरसीबी फ्रँचायझी आणि सरकारला बुधवारी सन्मान सोहळा आयोजित न करण्याचा सल्ला दिला होता. तो रविवारी आयोजित करण्याची शिफारस केली होती. परंतु आरसीबी व्यवस्थापनाने परदेशी खेळाडू तोपर्यंत निघून जातील आणि सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असा युक्तिवाद केला. त्यामुळे कामाच्या दिवशी हा सोहळा आयोजित करून गर्दीत आणखी भर पडली.

3.सामन्यापेक्षाही कमी वैद्यकीय सुविधा
बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामन्याच्या दिवसांपेक्षाही अधिक गर्दी होती. तरीही वैद्यकीय सुविधा अत्यंत तोकड्या होत्या. सामान्यतः सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये पुरेसे पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी तैनात असतात. मात्र, 4 जून रोजी बंगळूरु स्टेडियममध्ये कर्मचाऱ्यांनी पुरेसे सहायक कर्मचारी नसल्याचे सांगितले.
4.वैद्यकीय कमांड सेंटर
एनडीटीव्हीने स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वैद्यकीय कमांड सेंटरला भेट दिली. तेथे कोणताही कर्मचारी नव्हता. जखमी चाहते पाणी आणि प्रथमोपचाराच्या शोधात तेथे पोहोचले. तेव्हा ते केंद्र रिकामे होते. वैद्यकीय कक्षात रक्ताने माखलेले रुमाल आणि इतर वस्तू विखुरलेल्या होत्या.
5. 35 हजार क्षमता, पण गर्दी 3 लाखांपेक्षा जास्त
स्टेडियमच्या बाहेरही पोलिसांची उपस्थिती सामन्याच्या दिवसांएवढी नव्हती. एम. चिन्नास्वामी स्टेडियमची कमाल क्षमता सुमारे 35,000 असताना, आरसीबीच्या पहिल्या विजयामुळे तेथे तीन लाखांहून अधिक लोक जमा झाले होते.

6. विधान सौध आणि स्टेडियममध्ये विभागलेले पोलीस जवान
मैदानावर पोलिसांच्या कमतरतेचे कारण विधान सौधमध्ये अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता असू शकते, जिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक व्हीआयपी उपस्थित होते. खेळाडूही अधिकृत सन्मान सोहळ्यासाठी विधान सौधला गेले होते. ज्यामुळे पोलीस दलाचे विभाजन झाले.
7. मोफत प्रवेश आणि 'पहिला येणाऱ्याला प्राधान्य'
4 जून रोजी जेव्हा सोहळा आत सुरू होता, तेव्हा बाहेर अराजकता पसरली होती. मोफत प्रवेशामुळे प्रचंड गर्दी झाली होती. ज्यामुळे स्टेडियमचे गेट जाम झाले होते. समारंभात सहभागी होण्यासाठी आत घुसण्याचा प्रयत्न हजारो लोक करत होते. त्याच वेळी ही चेंगराचेंगरी झाली.
8. आरोप-प्रत्यारोप आणि जबाबदारीपासून पळ
चेंगराचेंगरीबद्दल आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बीसीसीआय आणि आयपीएलने या घटनेतून स्वतःला वेगळे केले असून, आरसीबी फ्रँचायझीला दोषी ठरवले आहे. विरोधी भाजपनेही सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

9. सामान्य लोकांचीही जबाबदारी
चेंगराचेंगरी कुठेही असो, लोकांच्या समजूतदारपणाची भूमिका महत्त्वाची असते. जेव्हा समोर अनियंत्रित गर्दी दिसत असेल, तेव्हा गर्दीचा भाग होण्याऐवजी स्वतःला सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असते. तरीही लोक गर्दीसोबत पुढे जात होते.
10.आता सरकारला आली जाग
घटनेनंतर स्टेडियमला भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, "मी आत्ताच पाहिले की किती दरवाजे होते, तिथे अनेक समस्या होत्या. मला वाटते की जिल्हाधिकारी निश्चितपणे याकडे लक्ष देतील. आम्ही या प्रकरणात खूप गंभीर आहोत." त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरही त्यांचा पक्ष याबद्दल खूप चिंतित आहे आणि ते यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतील.

11. कर्मचाऱ्यांचा आभाव
4 जून रोजी बंगळूरु येथील स्टेडियममध्ये, ग्राउंड स्टाफ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पुरेसे सहायक कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ही मोठी अडचण निर्माण झाली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world