जाहिरात

Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी कशामुळे झाली? चौकशी अहवालात कारण आलं समोर

New Delhi Railway Station Stampede : चौकशी अहवालात म्हटले आहे की, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचे कारण प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याची घोषणा केली होती. 

Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी कशामुळे झाली? चौकशी अहवालात कारण आलं समोर

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे कारण काय होते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती चौकशी करत आहे. दरम्यान तपासाशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, चौकशी अहवालात म्हटले आहे की, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीचे कारण प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याची घोषणा केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Latest and Breaking News on NDTV

रात्री 8.45 वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक घोषणा करण्यात आली होती. जी प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशलशी संबंधित होती. अपघाताशी संबंधित हा अहवाल रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. हा अहवाल 16 फेब्रुवारी रोजी दिल्ली झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला.

(नक्की वाचा-  Crime News : लग्नाची वरात पाहण्यासाठी गॅलरीत आला, अडीच वर्षांच्या लहानग्याचा हकनाक बळी)

Latest and Breaking News on NDTV


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी अहवालात असे समोर आले आहे की अपघाताच्या रात्री महाकुंभ स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून निघेल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु काही वेळाने दुसरी घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये असे म्हटले होते की महाकुंभ विशेष ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वरून निघेल. ही घोषणा होताच प्रवाशांमध्ये धावपळ सुरु झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.

अपघाताच्या वेळी मगध एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 14 वर आणि उत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 15 वर उभी होती. तर प्रयागराज एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म 14 वर प्रवाशांची गर्दीही होती. मात्र घोषणा होताच प्रवाशांनी 12-13 आणि 14-15 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या जिना चढण्यास सुरुवात केली. त्यामुळे पादचारी पूल 2 आणि 3 वर मोठी गर्दी झाली होती. मगध एक्सप्रेस, उत्तर संपर्क क्रांती आणि प्रयागराज एक्सप्रेसचे प्रवासीही या पायऱ्यांवरून उतरत होते. अशा परिस्थितीत धक्काबुक्की सुरू झाली आणि त्याच दरम्यान काही प्रवासी पायऱ्यांवर घसरले आणि पडले. 

(नक्की वाचा-  Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)

Latest and Breaking News on NDTV

 उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू शेखर उपाध्याय यांनी  इंडियन एक्सप्रेसला सांगितले  की, "अनेक विभागांना अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले आहे. आरपीएफ त्यापैकी एक आहे. सर्व विभागांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मंत्रालयाने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती त्यांची चौकशी करेल आणि नंतर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचेल."

उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू उपाध्याय म्हणाले की, "प्रथमदर्शनी असे दिसते की प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर येणार होती. आरक्षित प्रवाशांव्यतिरिक्त, इतर प्रवाशांनाही या ट्रेनने प्रवास करायचा होता, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी होती. गर्दी नियंत्रित करण्यासाठी, प्रयागराजसाठी मागणीनुसार दुसरी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वर येईल अशी घोषणा करण्यात आली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी ही घोषणा ऐकताच, ते अचानक पायऱ्या चढू लागले. पायऱ्यांवर पूर्ण कोंडी झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली."