Republic Day 2026 : कोण आहेत भारतीय सैन्याचे 'भैरव'? प्रजासत्ताक दिनी दिसणार भारताची शक्ती! वाचा सर्व माहिती

Republic Day Parade 2026 : भारतीय लष्कराच्या दोन अत्यंत शक्तिशाली आणि आधुनिक बटालियन, भैरव आणि शक्तिबाण, प्रथमच जगासमोर आपली ताकद दाखवणार आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Bhairav Battalion : भैरव बटालियनमध्ये समावेश होण्यासाठी जवानांची निवड अत्यंत कडक प्रक्रियेतून केली जाते.
मुंबई:

Republic Day Parade 2026 : नवी दिल्लीतील कर्तव्य पथ यावर्षी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराच्या दोन अत्यंत शक्तिशाली आणि आधुनिक बटालियन, भैरव आणि शक्तिबाण, प्रथमच जगासमोर आपली ताकद दाखवणार आहेत. 

हे केवळ संचलन नसून भारतीय लष्कराची शिस्त, परंपरा आणि बदलत्या काळातील आधुनिक युद्ध कौशल्याचे एक जिवंत दर्शन असणार आहे. शत्रूचा काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बटालियन नक्की काय आहेत आणि त्यांचे महत्त्व काय, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

लष्कराची नवी ताकद भैरव बटालियन

भैरव बटालियन हे नाव भगवान शिवाच्या अत्यंत रौद्र आणि विनाशक अवतारावरून देण्यात आले आहे. ही बटालियन निर्भयता आणि आक्रमक रणनीतीचा एक मोठा ब्रँड मानली जाते. विशेष म्हणजे या बटालियनची स्थापना मागील वर्षीच ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली आहे. 

कोब्रा हे या बटालियनचे अधिकृत चिन्ह असून, ज्याप्रमाणे कोब्राचा दंश जीवघेणा ठरतो, तसाच या बटालियनचा प्रहार शत्रूसाठी विनाशकारी असतो. सध्या या बटालियनच्या प्रत्येक तुकडीमध्ये 250 सैनिक असून त्यांची तैनाती एलएसीपासून एलओसीपर्यंतच्या संवेदनशील सीमांवर केली जाणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Republic Day 2026: झेंडा फडकावणे आणि ध्वजारोहण यामध्ये काय आहे फरक? कधी विचार केलाय? )
 

निवड प्रक्रिया आणि विशेष प्रशिक्षण

भैरव बटालियनमध्ये समावेश होण्यासाठी जवानांची निवड अत्यंत कडक प्रक्रियेतून केली जाते. लष्कराच्या इन्फंट्री, आर्टिलरी, एअर डिफेन्स आणि सिग्नल्स यांसारख्या विविध विभागांमधून सर्वोत्तम जवानांना यासाठी निवडले जाते. या जवानांना केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही अत्यंत कठोर प्रशिक्षण दिले जाते. 

आधुनिक काळातील युद्धाचे स्वरूप बदलले आहे, त्यामुळे त्यांना ड्रोन ऑपरेशन्स, मल्टि डोमेन ऑपरेशन्स आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या हाताळणीत निष्णात केले जाते. क्लोज कॉम्बॅट आणि रात्रीच्या वेळी अचानक हल्ले करण्यात हे जवान माहीर असतात.

Advertisement

( नक्की वाचा : Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का? )
 

लक्ष्य भेदणारी शक्तिबाण बटालियन

भैरव बटालियनसोबतच शक्तिबाण बटालियन देखील या परेडचे मुख्य आकर्षण असणार आहे. शक्ती, वेग आणि अचूकता यांचा संगम म्हणजे शक्तिबाण बटालियन होय. ज्याप्रमाणे शक्तीने भरलेला बाण आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतो, त्याचप्रमाणे ही बटालियन आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक लष्करी मूल्यांच्या जोरावर काम करते. 

आधुनिक रायफल्स, हाय मोबिलिटी युनिट्स आणि अत्याधुनिक ड्रोन विरोधी यंत्रणेने ही बटालियन सज्ज आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत शत्रूचा बचाव मोडून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

Advertisement

भविष्यातील युद्धासाठी सज्ज भारत

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये या दोन नव्या बटालियनचा सहभाग असणे हा एक मोठा संदेश आहे. भारत आता केवळ जुन्या पद्धतीच्या युद्धतंत्रावर अवलंबून नसून, ड्रोन तंत्रज्ञान आणि वेगवान हालचालींवर आधारित आधुनिक युद्धासाठी सज्ज झाला आहे. कर्तव्य पथवरील जवानांचे हे पाऊल भारताच्या सीमा सुरक्षित हातात असल्याचे संपूर्ण देशाला सांगणार आहे. या दोन तुकड्यांचे संचलन आणि त्यांची शस्त्रे पाहून जगाला भारताच्या वाढत्या लष्करी शक्तीचा अंदाज येईल.