
देशभरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142 वी जयंती साजरी केली जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख राजकीय विचारवंत, लेखक कवी वीर सावरकर यांनी यांचे विचार आणि कार्य आजही प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 10 प्रेरणादायी विचार
- "सर्वांच्या हृदयात शल्यासारख्या खुपणाऱ्या दारूण दु:खाच्या असंतोषाच्या पोटीच क्रांती जन्म घेते आणि तसे असते म्हणूनच हजारो माणसे आपले स्वत:चे रक्त सांडण्यास आनंदाने पुढे सरसावतात."
- "1957 च्या क्रांतीच्या बुडाशी असलेली खरी दोन मूलभूत तत्वे म्हणजे स्वधर्म आणि स्वराज्य."
- "माझ्या कष्टमय आयुष्यात जर कोणता एखादा नियम अतिशय कडू पण अतिशय हित परिणामी झाला असेल तर तो सदोदित प्रतिकून तेच घडेल हे गृहीत धरून त्यास तोंड देण्याची मनाची सज्जता करून ठेवणं हाच होय."
- "जग त्याच लोकांचा आदर करते जे स्वतःसाठी उभे राहू शकतात आणि स्वतःच्या लढाया लढू शकतात."
- "संकटाच्या वेळी शांततापूर्वक तयारी आणि कृतीमध्ये धैर्य, हेच आपले ब्रीदवाक्य असले पाहिजे."
- "भारताची पवित्र भूमी माझे घर आहे, तिच्या शूरवीरांचे रक्त माझी प्रेरणा आहे आणि तिच्या इच्छेचा विजय हे माझे स्वप्न आहे."
- "मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये."
- "अस्पृश्यतेची प्रथा हे पाप आहे, मानवतेवरील एक कलंक आहे आणि त्याला कोणतेही समर्थन नाही."
- "खरा नेता उदाहरणाने नेतृत्व करतो, कृतीतून प्रेरणा देतो आणि दूरदृष्टीने सक्षम करतो."
- जर तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तर कोणीही तुम्हाला गुलाम बनवू शकत नाही. फक्त तुमची ओळख कलंकित होणार नाही याची खात्री करून घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world