- सनातन परंपरेत गंगा, गोदावरी आणि नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे
- भविष्य पुराणानुसार स्नान चार प्रकारचे असतात
- पहाटे 4 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत केलेले ब्राह्म स्नान शुभ आणि सुख-सौभाग्य वाढवणारे मानले जाते
Bath Types: सनातन परंपरेत विविध जलतीर्थांवर जाऊन स्नान करण्याचे मोठे महत्त्व मानले आहे. याच कारणामुळे सण-उत्सव आणि विशेष पर्व इत्यादी प्रसंगी लोक गंगा, गोदावरी आणि नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. तसे पाहता स्नान हे एक असे दैनंदिन कर्म आहे, ज्याच्याशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. धर्मशास्त्रामध्ये स्नानाचे महत्त्व आणि स्नानाशी संबंधित नियमांबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. स्नान करताना आणि त्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? तसेच कोणत्या वेळी केलेले कोणते स्नान काय फळ देते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
स्नान किती प्रकारचे असतात?
भविष्य पुराणानुसार स्नान चार प्रकारचे असतात:
- वायव्य स्नान
- वारुण स्नान: हे स्नान समुद्र किंवा पवित्र नद्यांमध्ये केले जाते.
- ब्राह्म स्नान: हे स्नान मंत्रोच्चारासह केले जाते.
- दिव्य स्नान: हे स्नान पावसाच्या पाण्यात केले जाते.
पौराणिक मान्यतेनुसार या सर्वांमध्ये 'वारुण स्नान' सर्वोत्तम मानले गेले आहे.
कोणत्या वेळी कोणते स्नान होते?
- हिंदू मान्यतेनुसार जर तुम्ही पहाटे 4 वाजेपासून ते 5 वाजेदरम्यान आराध्य देवी किंवा देवतेचे ध्यान करत स्नान केले तर ते ब्रह्म स्नान मानले जाते. हे स्नान शुभ आणि सुख-सौभाग्य वाढवणारे मानले गेले आहे.
- पहाटे 5 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेदरम्यान केले जाणारे स्नान देव स्नान मानले जाते. हे स्नान देखील ब्रह्म स्नानासारखेच शुभ मानले जाते आणि पवित्र नद्यांचे तसेच देवाचे ध्यान करत हे स्नान केल्याने व्यक्तीची कीर्ती आणि यश वाढते.
- हिंदू मान्यतेनुसार जर एखादी व्यक्ती सकाळी 6 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेदरम्यान स्नान करत असेल तर ते मानव स्नान मानले जाते. हे स्नान केल्याने मनुष्य तन आणि मनाने पवित्र होतो.
- हिंदू मान्यतेनुसार सूर्योदयानंतर साधारण दोन तासांनी जे काही स्नान केले जाते, ते 'राक्षसी स्नान' (What is Rakshasi Snan) या प्रकारात येते. धर्मशास्त्रात हे स्नान टाळण्याचा आणि शुभ वेळेत स्नान करण्याचा सल्ला दिला गेला आहे.
- हिंदू मान्यतेनुसार स्नान करताना तुमचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून स्नान करू नका, कारण ही पितरांची दिशा मानली जाती. या दिशेला तोंड करून स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडण्याची शक्यता असते, अशी मान्यता आहे.
- हिंदू मान्यतेनुसार कधीही पूर्णपणे निर्वस्त्र (कपड्यांशिवाय) होऊन बाथरूममध्ये किंवा नदीमध्ये स्नान करू नये.
- हिंदू मान्यतेनुसार स्नान नेहमी शुद्ध आणि पवित्र पाण्याने करावे. विहीर किंवा हँडपंप इत्यादींच्या मदतीने दुसऱ्याने व्यक्तीने काढलेल्या किंवा दुसऱ्याने वापरून उरलेल्या पाण्याने कधीही स्नान करू नये.
- विविध सण-उत्सवांच्या वेळी पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे, असे केल्याने तीर्थस्नानाचे पुण्यफळ मिळते.
(नक्की वाचा : Night vs Morning Bath: कोणत्या वेळी आंघोळ करणं जास्त चांगलं? सकाळी की रात्री? जाणून घ्या बेस्ट वेळ)
स्नान करताना पवित्र नद्यांचे स्मरण खालील मंत्राचा जप करत करावे:
गंगा च यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन संनिधिम कुरु.

Photo Credit: PTI
स्नान केल्यानंतर कधीही करू नये ही कामे
- स्नान केल्यानंतर बादलीत किंवा टबमध्ये घाणेरडे पाणी सोडू नये.
- स्नान केल्यानंतर घाणेरडे आणि ओले कपडे बाथरूममध्ये सोडू नये. जर तुम्ही नदीत स्नान करत असाल, तर स्नान केल्यानंतर तुमचे कपडे कधीही गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये धुवू नये.
- स्नान केल्यानंतर कधीही आधी घातलेले जुने किंवा घाणेरडे कपडे पुन्हा घालू नये.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world