Chandra Grahan 2026: यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी लागणार आहे. हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल आणि ते भारत देशातही दिसणार आहे. चंद्रग्रहणाबाबत (Chandra Grahan 2026 News) लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ग्रहणाच्या वेळी आकाशाकडे पाहावे की पाहू नये? चंद्रग्रहण पाहिल्यास जीवनावर कोणते परिणाम होतात? ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...
धूलिवंदनाच्या दिवशी लागणार पूर्ण चंद्रग्रहण - काय करावे आणि काय टाळावे? | Chandra Grahan 2026 Date And Timings
ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांनी NDTV सोबत बातचीत करताना सांगितले की, हे चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण दुपारी 3.20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी सुमारे 6 वाजता पूर्णपणे दिसेल.
सुतक काळ कधी सुरू होईल? | Chandra Grahan 2026 Sutak Kaal
चंद्रग्रहणाचा सुतक काळ साधारणपणे 9 तास आधी सुरू होतो. त्यानुसार 3 मार्च रोजी सकाळी 6.20 वाजता सुतक काळ सुरू होईल. सुतक काळात शुभ आणि मंगल कार्य केले जात नाहीत. मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात आणि मूर्तीपूजा थांबवली जाते.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा)
चंद्रग्रहणाच्या वेळी आकाशाकडे पाहावे की नाही?
- ज्योतिषाचार्यांच्या मते, हे चंद्रग्रहण सिंह राशीत लागणार असल्याने वेगवेगळ्या राशींवर त्याचा वेगळा परिणाम होईल. यानुसार -
- कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींनी हे ग्रहण पाहू नये.
- ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्र ग्रह कमकुवत आहे, पापग्रहांच्या प्रभावाखाली आहे, त्यांनीही ग्रहण पाहणे टाळावे.
- ग्रहण पाहिल्यास या राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान, आरोग्याशी संबंधित समस्या आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
- गर्भवती महिलांनीही ग्रहणाच्या काळात बाहेर जाणे किंवा आकाशाकडे पाहणे टाळावे. त्यांना विशेष काळजी घेण्याचा आणि घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो.
- वृषभ, मिथुन आणि तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण सकारात्मक मानले जात आहे.
- त्यांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात.
- आर्थिक स्थिती सुधारू शकते.
- रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- पैसा, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याचे योग आहेत.
इतर राशींसाठी हे ग्रहण सामान्य फलदायी राहील. जास्त चिंता करण्याची गरज नाही, पण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: होळीवर चंद्रग्रहणाचं सावट, 12 राशींवर काय होणार परिणाम? कोणी सतर्क राहावं? वाचा ज्योतिषींची माहिती)ग्रहणाच्या वेळी काय करावे?- मंत्रजप, ध्यान आणि देवाच्या नावाचे स्मरण करणे शुभ मानले जाते.
- ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे आणि घराची स्वच्छता करणेही शुभ मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)