- देशातील अनेक भागांत उन्हाचा पारा 44 ते 48 अंश सेल्सिअसच्या पातळीवर पोहोचल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे
- उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होते, ज्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे उपयुक्त ठरतात
- तरबूज, खरबूज, संत्री आणि द्राक्षे यांसारखी फळे शरीराला तातडीने थंडावा देतात
How to Prevent Heatstroke Naturally: देशाच्या अनेक भागांत सध्या उन्हाचा पारा 44 ते 48 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. या तीव्र उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि हीटस्ट्रोकचा (उष्माघात) धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा स्थितीत शरीराला तातडीने थंडावा देण्यासाठी अनेकजण फ्रीजमध्ये ठेवलेली थंड फळे खाण्याला पसंती देतात. मात्र, ही थंड फळे उष्माघातावर पूर्ण उपाय ठरू शकतात का, याविषयी वैद्यकीय दृष्टिकोनातून जाणून घेणे आवश्यक आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत.
तीव्र उन्हामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो. ज्यामुळे पाणी कमी होते. कलिंगड,टरबूज, खरबूज, द्राक्षे आणि संत्री यांसारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ही फळे थंड करून खाल्ल्याने शरीराला तात्कालिक थंडावा मिळतो. काही प्रमाणात हायड्रेशन प्राप्त होते. परंतु, हे केवळ उन्हापासून आराम देण्याचे एक माध्यम आहे, हीटस्ट्रोकवरील अंतिम उपचार नव्हे असं तज्ज्ञ सांगतात.
उष्माघातापासून वाचवणारी प्रमुख फळे
टरबूज आणि खरबूज:
- यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते.
संत्री आणि मोसंबी:
- सायट्रस प्रकारातील ही फळे प्रवासातही सोयीस्कर ठरतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
द्राक्षे आणि पपई:
- थंड द्राक्षे झटपट ऊर्जा देतात, तर पपई पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

अतिथंड फळांचे दुष्परिणाम आणि खबरदारी
अतिप्रमाणात थंड फळे खाल्ल्याने घशाची संवेदनशीलता किंवा दातांमध्ये जळजळ होऊ शकते. तसेच, एकाच वेळी जास्त प्रमाणात फळे खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांच्या मते, केवळ फळांवर अवलंबून न राहता शरीरातील खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस (ORS), लिंबू पाणी आणि ताक यांसारख्या पेयांचा वापर करणे आणि पुरेसे पाणी पिणे अत्यंत अनिवार्य आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world