13 hours ago

अहमदाबाद विमान दुर्घटनेत काल रात्री उशिरापर्यंत अडीचशेहून अधिक नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल गोळा करण्यात आले आहेत. पुढील सात तासात डीएनए रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. आज ज्यांनी डीएनए सॅम्पल दिले.  रिपोर्ट सादर केलेल्यांकडून अतिरिक्त कागदपत्रे गोळा केली जाणार आहे. त्यामुळे रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यासाठी उशीर लागणार नाही

Jun 14, 2025 22:43 (IST)

Live Update : पुण्यातील KEM हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुण्यातील KEM हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे पोलिसांना मेल वरून आली धमकीत

पुणे पोलीस आणि BDDS च पथक घटनास्थळी 

अज्ञात व्यक्तीकडून पुणे पोलिसांना आला मेल 

पुणे पोलिसांकडून तपास सुरू

Jun 14, 2025 21:38 (IST)

गुहागरमधील साखरीआगरध्ये कोसळली दरड

रत्नागिरी जिल्ह्यात आज काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. गुहागरमध्ये देखील पावसाने आज जोरदार हजेरी लावली..  मुसळधार पावसामुळे साखरी आगर गावातील एक नंबर जिल्हा परिषद शाळेजवळ दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. तसेच शाळेचंही नुकसान झालं नाही.

Jun 14, 2025 21:37 (IST)

Live Update : दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला, महाडमध्ये जोरदार पाऊस

दक्षिण रायगड मध्ये पावसाचा जोर वाढला. महाड मध्ये जोरदार पाऊस.

महाड सह पोलादपूर, माणगाव, गोरेगाव, लोणेरे, तालुक्यातील काही ग्रामीण भागासह जोरदार पाऊसामुळे जन जिवन विस्कळीत.

दक्षिण रायगड मध्ये म्हणजे महाड मधील चवदार तळे, मुस्लिम मोहल्ला, नवे नगर, बाजारपेठ, शहरी भागात पावसाचा जोर वाढला.

Jun 14, 2025 19:07 (IST)

Live Update : बालाघाटमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक 4 नक्षली ठार

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. पचामा दादरच्या डोंगराळ भागात ही चकमक झाली. बालाघाट जिल्ह्यात काही दिवसा पासुन नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या होत्या आणि या चकमकीनंतर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत तीन महिला नक्षलवादी आणि एक पुरुष नक्षलवादी ठार झाले आहे.

Advertisement
Jun 14, 2025 17:11 (IST)

Live Update : गोवंडी शिवाजीनगर येथे डंपरने चार जणांना चिरडले, सर्व ठार

गोवंडी शिवाजी नगर येथे डंपर गाडीने चार जणांना चिरडले यात चार तरुणांचा  मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे


घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून संतप्त नागरिकांनी पोलिसांनाच आता घेराव घातला आहे 

गोवंडी शिवाजीनगर सिग्नल येथे ही सर्व घटना घडली असून तणावाचे वातावरण सध्या या ठिकाणी निर्माण झाले आहे

Jun 14, 2025 15:11 (IST)

वर्ध्यात एका कोरोणाबाधित रुग्णाचा मृत्यू

वर्ध्यात एका कोरोणाबाधित रुग्णाचा मृत्यू

मृतक हा पुलगाव येथील रहिवासी असून तो 6 जून ला सेवाग्राम येथे भरती झाला होता 

यानंतर 11 जूनला कोरोना टेस्ट झाली ती पॉझिटिव्ह आली आणि आज 14 ला मृत्यू झाला

मृतकाला दारूची पिण्याची सवय असून त्याचे लिव्हर खराब झाले होते.

Advertisement
Jun 14, 2025 14:24 (IST)

अखेर बच्चू कडू यांचे सातव्या दिवशी अन्नत्याग आंदोलन मागे...

अखेर बच्चू कडू यांचे सातव्या दिवशी अन्नत्याग आंदोलन मागे...

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीला यश...

पावसाळ्याचे दिवस असल्याने आंदोलन मागे घेत आहे, बच्चू कडू

दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारला अल्टिमेंटम....

कर्जमाफी 2 ऑक्टोंबर पर्यंत झाली नाही तर पुन्हा बच्चू कडू आक्रमक होणार....

Jun 14, 2025 13:31 (IST)

Live Update : ठाकरे गटाच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची उद्या शिवसेना भवन येथे 11 वाजता बैठक

ठाकरे गटाच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची उद्या शिवसेना भवन येथे 11 वाजता बैठक

बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहून महिला आणि पुरुष शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करणार... 

आगामी महानगर पालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी बोलावली महत्वाची बैठक 

आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीने निरीक्षक नेमून विधानसभा निहाय बैठका घेत आहेत 

यानंतर स्वतः पक्ष प्रमुख शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत

Advertisement
Jun 14, 2025 13:00 (IST)

Live Update : आज निर्णय झाला नाही तर 16 तारखेला जलत्याग सुद्धा करणार - बच्चू कडू

कर्जमाफीचा लवकर निर्णय व्हायला पाहिजे होता - बच्चू कडू

 कर्जमाफीचा अहवाल केव्हा येणार? कर्जमाफी केव्हा होणार याची तारीख सांगितली नाही 

 कर्जमाफी बद्दल सरकार बोलायला लागला आहे पण केव्हा करणार हे सांगत नाही 

 कर्जमाफी केव्हा करणार हा निर्णय झाला नाही 

 पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त लावला आहे. मात्र कार्यकर्ते कमी पडणार नाही 

 रोज मेल्यापेक्षा एकदाच मरण परवडलं अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे 

 आज निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी  कुठलही आंदोलन करू नये - बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना आवाहन 

 आज निर्णय झाला नाही तर 16 तारखेला जलत्याग सुद्धा करणार

 पुण्यातील माझे कार्यकर्ते आक्रमण झाले आहे 

 माझी तब्येत खालावत आहे सरकार निर्णय घेत नाही म्हणून ते आंदोलन करत आहे

Jun 14, 2025 12:28 (IST)

Live Update : मुंबईकडे येणाऱ्या हावडा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कसारा ते कल्याण अप लाइन विस्कळीत

मुंबईकडे येणाऱ्या हावडा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

खर्डी आणि उमरमाली स्टेशन दरम्यान एक्सप्रेस थांबली

कसारा ते कल्याण अप लाइन विस्कळीत

Jun 14, 2025 12:09 (IST)

Live Update : अजित पवारांच्या कार्यक्रमात बच्च कडूंच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

बच्चू कडूंचे कार्यकर्ते अजित पवारांच्या कार्यक्रमात आक्रमक 

Jun 14, 2025 12:08 (IST)

Live Update : आता परदेशी शिक्षणासाठी देश सोडण्याची गरज नाही, शैक्षणिक करार होणार

महाराष्ट्रातील विद्यापीठाचा विदेशी विद्यापीठांसोबत शैक्षणिक करार होणार 

आता परदेशी शिक्षणासाठी देश सोडण्याची गरज राहणार नाही

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार होणार 

काही प्रमुख आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करण्यात येणार आहे

या करारांतर्गत विदेशी विद्यापीठांच्या शाखा नवी मुंबईत सुरू करण्यात येणार 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे उच्च शिक्षण महाराष्ट्रातच मिळणार यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना लाभ होईल

Jun 14, 2025 10:17 (IST)

Live Update : पुण्यातील दिवेघाटात काल तुफान पाऊस

पुण्यातील दिवेघाटात काल तुफान पाऊस 

पावसामुळे डोंगरावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले 

दिवेघाटात सध्या रस्ता विस्तारीकरण सुरू आहे 

त्यामुळे घाटावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलीय 

त्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत माती ही रस्त्यावर येत आहे

Jun 14, 2025 10:16 (IST)

Live Update : रात्रीच्या मुसळधार पावसाचा महाकाली मंदिराला फटका

रत्नागिरी जिल्ह्यात रात्री काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला.. राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातही रात्री मुसळधार पाऊस  कोसळला. या पावसाचा फटका आडिवरे गावातील महाकाली मंदिरालाही बसला, महाकाली मंदिराच्या आवारात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. मंदिराचा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. पहिल्यांदाच मंदिरात पाणी आल्याने ग्रामस्थही अंचबित झाले..

दरम्यान मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि रस्तेही जलमय झाले होते. काही घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.

Jun 14, 2025 08:59 (IST)

Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सोलापूर दौरा रद्द

- उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सोलापूर दौरा रद्द 

- प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देण्याच्या कारणास्तव दौरा रद्द झाल्याची माहिती 

- मंत्री उदय सामंत आज दिवसभर सोलापुरातील विविध ठिकाणी भेटी देणार होते 

- शिवसेना शिंदे गटाच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात मंत्री उदय सामंतांच्या हस्ते होणार होती

Jun 14, 2025 08:41 (IST)

Live Update : कोरोनाच्या आढाव्या प्रकरणी पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल

पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल..

वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येचा  उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा.

वाढत्या कोरोना रुग्णावर आरोग्य अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक..

बैठकीला विभागीय आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त पुणे मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित..

Jun 14, 2025 07:49 (IST)

Live Update : वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्यता

जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाच्या कडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हा प्रशासन अकोला यांच्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर आपत्ती पासून निवारण करण्यासाठी सज्ज झालं आहे.. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे.

Jun 14, 2025 07:48 (IST)

Live Update : 40 शिक्षकांना चुकीची माहिती भरणे भोवले, सीईओंच्या लॉगिनवरून शिक्षकांचे बदलीचे प्रस्ताव डिलिट

 धाराशिव जिल्ह्यातील 40 शिक्षकांना बदलीसाठी चुकीची माहिती भरणे चांगलेच भोवले आहे. चुकीची माहिती भरलेल्या या 40 शिक्षकांवर ठोस कारवाई करण्यात आली असून त्यांचे बदलीचे अर्ज सीईओंनी थेट डिलीट केले आहेत. सध्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू असून सुमारे 2518 शिक्षक बदलीस पात्र आहेत. यापैकी संवर्ग एक आणि दोन अंतर्गत 1141 शिक्षकांनी ऑनलाइन प्रस्ताव दिले होते. यातील 40 शिक्षकांनी चुकीची माहिती बदल्याचे तालुकास्तरीय पडताळणीत समोर आले होते. त्यामुळे या शिक्षकांच्या अर्ज बाद ठरविण्यात आले असून त्यांच्या बदलीचे प्रस्ताव सीईओ यांच्या लॉगिन वरून डिलीट करण्यात आलेत.