जाहिरात

Plane crash News: कॉकपिटजवळची सीट सर्वात सुरक्षित का? 1993 च्या अपघातात वाचलेल्या प्रवाशाचा भयंकर अनुभव

परभणीच्या एका कुटुंबाने त्यांची तिकिटे रद्द केली. त्यामुळे आम्हाला जागा मिळाली. मी नशीबवान होतो की मी कॉकपिटजवळ बसलो होतो, असं त्यांनी सांगितलं.

Plane crash News: कॉकपिटजवळची सीट सर्वात सुरक्षित का? 1993 च्या अपघातात वाचलेल्या प्रवाशाचा भयंकर अनुभव
मुंबई:

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्दैवी अपघातात शनिवारपर्यंत 274 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच अपघाताने महाराष्ट्रातील परभणी येथील एका रहिवाशाला 32 वर्षांपूर्वीच्या एका विमान अपघाताची कटू आठवण झाली. त्या अपघातात 55 लोकांचा बळी गेला होता. परभणीचे माजी महापौर वसंत शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, 1993 च्या दुर्घटनेतून ते वाचले. कारण ते कॉकपिटजवळ बसले होते. विमानाच्या मागील बाजूस तिथे इंधनाची टाकी होती. त्या ठिकाणी ते नव्हते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

29 एप्रिल रोजी घडली होती दुर्घटना
वसंत शिंदे इंडियन एअरलाईन्सच्या त्या विमानात होते. त्याने 26 एप्रिल 1993 रोजी तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यातील आणि आताचे छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावरून उड्डाण केले होते. औरंगाबाद-मुंबई 491 या विमानाचे लँडिंग गियर धावपट्टीच्या शेवटी उड्डाण करताना रस्त्यावर एका ट्रकला धडकले. त्यानंतर ते एका शेतात कोसळण्यापूर्वी उच्च-तणावाच्या विद्युत तारांना धडकले. त्यामुळे त्याचे तीन तुकडे झाले. त्याला आग लागली. विमानात असलेल्या 112 प्रवाशांपैकी 55 लोकांचा मृत्यू झाला. असा थरारक प्रसंग त्यांनी सांगितला. 

ट्रेंडिंग बातमी - Plane crash News: नेपाळची मुलगी, बिहारमध्ये शिकली, विमान कंपनीत कमाला लागली, पण पुढे भयंकर शेवट

आगीत होरपळून झाला होता लोकांचा मृत्यू
शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले, ‘मी आणि काँग्रेस नेते रामप्रसाद बोर्डीकर शरद पवारांच्या कार्यक्रमासाठी मुंबईला जात होतो. आम्हाला नक्की विमान तिकीट मिळेल की नाही, हे माहित नव्हते. पण परभणीच्या एका कुटुंबाने त्यांची तिकिटे रद्द केली. त्यामुळे आम्हाला जागा मिळाली. मी नशीबवान होतो की मी कॉकपिटजवळ बसलो होतो.' असं शिंदे सांगतात. 'बोर्डीकर आणि मला मागील सीटची ऑफर दिली होती. पण आम्ही कॉकपिटजवळ बसणे पसंत केले. आम्ही वाचलो, पण मागील भागात बसलेले लोक आगीत होरपळून मरण पावले. असं त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

अहमदाबादचा अपघात 
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 171 विमानाचा अपघात होताच अनेक स्वप्नेही भंग पावली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानाला लंडनच्या गॅटविक येथे उतरणे अपेक्षित होते. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच विमान कोसळले. यात 230 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर 1993 सालच्या अपघाताच्या आठवणी वसंत शिंदे यांनी सांगितलं. केवळ कॉकपिटच्या जवळ असल्यानेच आम्ही वाचलो असं ते आवर्जून सांगतात. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com