Ashadhi Wari 2025 : 700 वारकरी अन् 1275 किमीचा प्रवास; श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान

श्रींच्या पालखीचे विशेष महत्त्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त, स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल गावंडे, प्रतिनिधी 

विदर्भाची पांढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा 'श्री'चा पालखीने पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह आज 2 जून रोजी सकाळी प्रस्थान केले. श्रींच्या पालखीचे हे 56 वे वर्ष आहे. पालखी सोबत 700 वारकरी एकूण 1275 किलोमीटरचा रस्ता  विठ्ठलाच्या जयघोषात 2 महिन्यात पूर्ण करणार आहेत. पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतांना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संपुर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगावचं गजानन संस्थानाकडून 1968 पासून पंढरपूरला पायी वारी केली जाते. या दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत 725 कि.मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. असा एकूण प्रवास 1275 किलोमीटरचा आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो.

Advertisement

नक्की वाचा - Ashadhi Wari : विम्याचा लाभ, टोलमाफी, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं घेतले मोठे निर्णय

तद्नंतर श्रींची पालखी आज सोमवार २ जून ला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान केले. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखी सोबत होते. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. 

Advertisement

श्रींच्या पालखीचे विशेष महत्त्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त, स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे. विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होताच स्वागत केले. श्रींच्या पालखीचा हा प्रवास आज 2 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी पहिला मुक्काम अकोला जिल्ह्यातील पारस येथे राहणार आहे. परतीच्या प्रवास हा 10 जुलै रोजी सुरू होणार असून 31 जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे.

Advertisement