ठाण्याच्या हजुरी गौतम नगर भागात एका कचऱ्याच्या पेटीत गायीचं मस्तक सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गोहत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. अधिकचा तपास वागळे पोलिसांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती.
दर वेळी हजूरी विभागाध्ये का अशी घटना घडते, असा सवाल बजरंग दलाकडून उपस्थित केला जात आहे. बजरंग दलाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तत्काळ आरोपीला अटक केली नाही तर मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
नक्की वाचा - Navi Mumbai News: इंग्लंडहून महागडे गिफ्ट पाठवलं, एक फोन अन् महिलेच्या खात्यातून 50 लाख फुर्रर्रर्रssss
वागळे पोलिसांकडून गोहत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे पोलिसांकडून वेगवेगळ्या तुकड्या तैनात करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.