जाहिरात
Story ProgressBack

मांजरीला वाचवण्यासाठी एका मागून एक 6 जणांच्या विहिरीत उड्या; नगरच्या कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

काल राज्यभरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असताना एका गावात जीवघेणी शांतता पाहायला मिळाली. 

Read Time: 1 min
मांजरीला वाचवण्यासाठी एका मागून एक 6 जणांच्या विहिरीत उड्या; नगरच्या कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
अहमदनगर:

अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील वाकडी गावात एका मांजराला वाचवताना पाच जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल राज्यभरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असताना एका गावात जीवघेणी शांतता पाहायला मिळाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाकडी गावात एका घराजवळच वापरात नसलेली एक विहीर आहे. त्या विहीरीचा वापर शेण टाकण्यासाठी केला जात होता. अचानक या विहिरीत मांजर पडलं, त्याला वाचविण्यासाठी विशाल काळे (23) विहिरीत उतरले होते. ते गाळात रुतल्याचं पाहताच मागोमाग त्यांचे वडील अनिल काळे (58) विहिरीत उतरले. बराच वेळ झाला तरी ते वर न आल्याने सालगडी बाबासाहेब पवार (35) विहिरीत उतरले. तेही विहिरीतील गाळात अडकून पडले.

यानंतर अनिल यांचे चुलतभाऊ संदीप काळे (36) विहिरीत उतरलेय तेही वर आले नाही. यानंतर त्यांचे वडील माणिक काळे (65) विहिरीत उतरले. मात्र या सहा पैकी पाच जणांना गुदनरून मृत्यू झाला. यातील विजय काळे (36) यांचा वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय काळे यांनी कमरेला दोरी बांधून विहिरीत उडी टाकली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination