जूही जाधव
मुंबईत (Mumbai News) आरेच्या जंगलात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ सोमवारी (23 जून) 65-70 वयाची आजी यशोदा गायकवाड (Yashoda Gaikwad) सापडल्या होत्या. त्यांना त्वचेचा कर्करोग असल्याचं सांगितलं जात होतं. नातवाने त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून दिल्याची चर्चा केली जात होती. अखेर या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. सध्या या आजींवर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नातवाने त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडल्याची चर्चा चुकीची असल्याची समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय होतं प्रकरण?
शनिवारी सकाळी 7:30 च्या सुमारे आरे पोलीस स्थनकात एक 65-70 वर्षांची वृद्ध महिला यशोदा गायकवाड कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी स्थानिकांना आढळली होती. आधी संशय व्यक्त केला की, तिच्या नातवाने त्वचेचा आजार असल्याने तिला तिथे सोडून निघून गेला. मात्र पोलिसांनी या महिलेला तातडीने कुपर रुग्णालयात दाखल केलं. महिलेची चौकशी करण्यात आली. यावेळी त्या महिलेने पोलिसांना तीन पत्ते सांगितले होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
नक्की वाचा - Rain Update : पुणे, मुंबईत धुमशान; विदर्भातही मुसळधार पावसाचे संकेत
दिलेल्या तीन पत्त्यांमधील एक पत्ता कुरार गावातील आहे. या गावात तिचं एक दुकान असून ते तिने भाड्याने दिलं आहे. तिथून माहिती घेऊन तिच्या नातवाचा शोध घेतला गेला आणि अधिक माहिती घेतली. तिच्या घरी तिचा नातू सागर शेवाळे त्याची पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा राहतो. रोज सकाळी 7 वाजता पती-पत्नी कामाला जातात.
शनिवारी ही दोघं सवयीप्रमाणे सकाळी बाहेर पडले आणि त्यांच्या मागोमाग यशोदा गायकवाड या देखील बाहेर पडल्या. रात्री नऊ वाजता घरी आल्यावर आजी कुठे आहे नातवाला विचारल्यावर त्यांनी बाहेर गेल्याचं सांगितलं. या आधीही दोन ते तीन वेळा ही महिला घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. त्यामुळे नातवाने लगेच पोलिसात तक्रार केली नाही. मात्र पोलिसांनी नातवाचा शोध घेऊन त्या आजीला नातवाकडे सुपूर्द केली. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. त्या महिलेला त्वचेचा कर्करोग आहे आणि सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.