Marathwada Rain: मराठवाड्यातील 34 मंडळात अतिवृष्टीची नोंद; 25 वर्षांचा विक्रम मोडला

Marathwada Rain : राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच मराठवाड्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. 6 मे पासून सुरू असलेला मराठवाड्यातील पाऊस अजूनही थांबत नसल्याचे चित्र आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Marathwada Rains : यंदा मे महिन्यातच मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, हिंगोली नांदेड या पाच जिल्ह्यातील तब्बल 34 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार या 34 महसूल मंडळाअंतर्गत 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. शासनाच्या नियमानुसार 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास, त्या ठिकाणी अतिवृष्टी समजली जाते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच मराठवाड्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. 6 मे पासून सुरू असलेला मराठवाड्यातील पाऊस अजूनही थांबत नसल्याचे चित्र आहे. अशात 27 आणि 28 मे रोजी देखील मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली. गेल्या 24 तासांत मराठवाड्यात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. 

(नक्की वाचा-  Rain Alert : राज्यातील 6 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाचा अंदाज; मुंबई-पुण्यात कशी असेल स्थिती?)

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडला?

  • जालना : 44 मिमी
  • नांदेड : 30 मिमी
  • बीड 26 मिमी
  • हिंगोली27 मिमी
  • लातूर 22 मिमी
  • धाराशिव 10 मिमी

दुष्काळी पट्टा म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. सरासरी जून महिन्यात मराठवाड्यात पावसाची एन्ट्री होते. मात्र यंदा 6 मे पासूनच मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली. मे महिन्यातील 28 पैकी 16 दिवस पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 25 वर्षात मे महिन्यात इतक्या दिवस पाऊस पहिल्यांदाच बरसला आहे. मराठवाड्यात यंदा मे महिन्यात सरासरी 177 मिमी पाऊस पडला असून, गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडला आहे.

(नक्की वाचा-  MSP News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! सोयाबीन, कापसासह १४ वाणांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ)

34 मंडळात अतिवृष्टीची नोंद

मराठवाड्यात मंगळवारी 34 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ज्यात सर्वाधिक जालना जिल्ह्यातील 17 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 मंडळात अतिवृष्टी झाली असून, लातूर जिल्ह्यातील 5 मंडळ, नांदेड जिल्ह्यातील 3 मंडळ, हिंगोली जिल्ह्यातील 4 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article