
Weather Forecast : मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मागील आठवडाभरापासून सुरु झालेला पाऊस अजूनही कायम आहे. कोकण आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत मागील काही दिवसात धो-धो पडणाऱ्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली होती. मात्र आज मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच पुण्यात देखील हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- MSP News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! सोयाबीन, कापसासह १४ वाणांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ)
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
रायगड, जळगाव, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलडाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(नक्की वाचा - Fishermen News: मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद, महिला मच्छीमारांना होणार फायदा)
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना या काळात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं पडणे, विजेचे खांब कोसळून नुकसान होणे आणि वीज प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world