
लक्ष्मण साळुंके, जालना: जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी 11 महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ही धडक कारवाई केली आहे. यापूर्वी 10 तलाठ्यांचं निलंबन करण्यात आले. याप्रकरणात आणखी महसूल कर्मचारी रडावर आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी कारवाई करत आज पुन्हा 11 महसूल कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 2022, 23 आणि 24 वर्षांत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झालं होतं. त्याच्या भरपाई पोटी शासनाने 110 कोटी 94 लाख 46 हजार 900 रुपये मंजूर करण्यात आले होते.
यापैकी 110 कोटी 60 लाख 2 हजार 223 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.. मात्र घनसावंगी आणि अंबड तालुक्यात तहसीलदारांच्या लाॅगईन पासवर्डचा गैरवापर करून कर्मचार्यांनी काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जास्तीची रक्कम वर्ग केली, तर काहींना दुबार अनुदान दिल्याचेही निष्पन्न झाले. या दोन तालुक्यात 34 कोटी 97 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं असून 87 कर्मचार्यांकडून या प्रकरणी खुलासे मागवण्यात आले.
तपासाअंती पहिल्या टप्प्यात दहा तलाठ्यांचं जिल्हाधिकार्यांनी निलंबन केलं होत आज पुन्हा जिल्हाधिकारी यांनी आणखी 11 निलंबन केला असून यात 6 तलाठी, एका मंडळ अधिकारी व चार सहा. महसूल अधिकाऱ्याचा समावेश आहे घोटाळ्यात सहभागी असलेल्या 87 जणा पैकी आत्ता पर्यंत 21 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आणखी कर्मचारी रडावर असल्याचं समोर येत असल्याने जिल्ह्यात घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता ही वर्तविली जातं आहे..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world