Jalna News: 'पुन्हा मतदान केलं नाही तर गावाला फुली मारेन..', भाजप आमदाराची गावकऱ्यांना धमकी

Babanrao Lonikar News: बबनराव लोणीकर यांनी  जालन्यातील बोरगावमध्ये भाजपाला मतदान न करणाऱ्या मतदारांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. यावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना: 'आता पुन्हा मतदान केलं नाही तर तुमच्या गावाला फुली मारेन...', असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी गावकऱ्यांना उघडपणे धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 8 कोटींचा विकास निधी दिला, आतां त्यावर फुली मारू का.? असे म्हणत बबनराव लोणीकर यांनी  जालन्यातील बोरगावमध्ये भाजपाला मतदान न करणाऱ्या मतदारांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. यावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीत परतूर -मंठा मतदार संघात कमी मतदान झाल्याने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी चक्क मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बबनराव लोणीकर यांनी मतदार संघातील बोरगावात विकास निधीवर बोलताना 'मी तुमच्या गावात पाच वर्षानंतर एकदा फुली मागायला येतो. पूर्वीच्या काळी बारा बलुतेदार होते. आमचं बलुत हे पाच वर्षात एकदा कमळाचं बटन दाबायचं. ते केलं नाही जाऊ द्या. अस म्हणत आता झालं ते झालं. आमचे काही कार्यकर्ते रुसले गावाने आम्हाला धोका दिला, अस म्हणत मतदान केलं नाही तर तुमच्या गावाला फुली मारेल अशी भर कार्यक्रमात मतदारांना धमकी दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.

Advertisement

आमदार लोणीकर मतदार संघातील बोरगावात विकास निधीवर बोलत असताना त्यांनी हे विधान केले. मला चांगलं मतदान मिळावं म्हणून मी आठ कोटींचा निधी दिला.पण काही कार्यकर्ते नाराज झाले.गावाने ही धोका दिला.त्यामुळं भाजपाला कमी मतदान झालं. याच मुद्द्यावरुन बबनराव यांनी गावकऱ्यांकडे खंत ही व्यक्त केली.

Advertisement

Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!

तसेच मतदान केलं नाही तर निधीसाठी एक, दोन किंवा तीन वेळेस पैसे देईन.पण वारंवार तसं होत राहील तर गावाला निधी देण्यास फुली मारेन,अशी धमकीच गावकऱ्यांना भर सभेत दिली. त्यामुळे लोणीकर यांच्या ही धमकी मतदार संघात पुन्हा चर्चेचा विषय ठरलीय.त्यांच्या या वक्तव्यावरुन आता विरोधकांकडून काय टीका केली जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement