Maharashtra FYJC Admission 2025: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी ताटकळत असल्याचे समोर आले आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादी 26 जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. मात्र आता पुन्हा एकदा या तारखेत बदल करण्यात आला असून 30 जूनला ही यादी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार! 1 जुलैला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन
महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आता अकरावी प्रवेश प्रक्रियेची (FYJC)पहिली गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर करणार आहे. यापूर्वी ही यादी 26 जून 2025 रोजी जाहीर होणार होती. मात्र तांत्रिक बाबींमुळे प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यासोबतच, विभाग प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) म्हणजेच इयत्ता 11 वी मध्ये प्रवेशासाठी कटऑफ यादी देखील जाहीर करेल. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एकूण 9,435 कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांनी नोंदणी केली आहे, ज्यामध्ये एकूण 21,23,040 जागा आहेत. यापैकी 18,97,536 जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) अंतर्गत उपलब्ध आहेत आणि 2,25,514 जागा विविध कोट्यांतर्गत राखीव आहेत.
ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! वाचा सर्व अपडेट
मेरिट लिस्ट कशी डाऊनलोड कराल?
- महाराष्ट्र एफवायजेसीच्या अधिकृत प्रवेश पोर्टल mahafyjcadmissions.in वर जा.
- एफवायजेसी पहिली गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचे खाते अॅक्सेस करण्यासाठी तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, जसे की अर्ज क्रमांक आणि पासवर्ड, एंटर करा.
- एकदा लॉग इन केल्यानंतर, प्रदर्शित गुणवत्ता यादीमधून तुमचे वाटप तपशील पहा आणि डाउनलोड करा.
- भविष्यातील प्रवेश-संबंधित संदर्भासाठी डाउनलोड केलेल्या गुणवत्ता यादीचा प्रिंटआउट घ्या.
दरम्यान, दहावीची परीक्षा संपून तीन महिने उलटले आणि निकाल जाहीर होऊन सव्वा महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेतच आहेत. झटपट परीक्षा-झटपट निकाल सूत्र राबवून शालेय शिक्षण विभागाने नेमके काय साध्य केले, आमच्या फरफटीला नेमके जबाबदार कोण, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.