जाहिरात

Raj Thackeray: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र! गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं, अधिवेशनावरुन संताप

सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

Raj Thackeray: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र! गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं, अधिवेशनावरुन संताप

Raj Thackeray Letter TO CM Devendra Fadnavis:  देशाची राजधानी मुंबईमधून मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १० महिन्यांत  मुलींच्या अपहरणाचे १,१८७ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच दिवसाला सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत आहेत. यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर का चर्चा होत नाही? असा सवाल करत संताप व्यक्त केला आहे. 

काय आहे राज ठाकरेंचे पत्र?

सस्नेह जय महाराष्ट्र, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

Washim Politics: भाजपची मोठी कारवाई! 16 जणांचे 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन; कारण काय?

लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

राज्यात लहान मुली पळवल्या जात आहेत, लक्ष का नाही?

आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? असंही राज ठाकरे म्हणालेत. 

हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे, असं राज ठाकरेंनी म्हटले आहे. 

नक्की वाचा - Sonia Gandhi :'तुम्ही जागे व्हा, नाहीतर...'; सलग 6 पराभवावर काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना खरमरीत पत्र

खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा असल्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com