
मुंबई: मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना शेजारुन जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसचा धक्का लागल्याने 8 जण खाली पडले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर आता रेल्वे प्रशासनाने सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून यापुढे लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. यापुढे आता मुंबई क्षेत्रात धावणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्यांमध्ये गेट बंद करण्याची व्यवस्था असेल. ज्या नवीन गाड्या येणार आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.याच्यात आयसीएफद्वारे ज्या लोकल आहेत त्यांना रेट्रो फीट माध्यमातून दरवाजे लावणार आहेत.
नवीन गाड्यांसोबतच जुन्या गाड्यांमध्येही गेट बंद करण्याची व्यवस्था असेल. आजच्या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे आणि याबाबतचे आदेशही जारी केले आहेत मुंबईत मोठ्या संख्येने प्रवासी गाड्यांमध्ये लटकून प्रवास करतात अशा परिस्थितीत अनेक वेळा गंभीर घटना घडतात, ज्या टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता लोकलचे दरवाजे बंद राहतील अशी व्यवस्था करण्याबाबतचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कसारा येथून सीएसएमटीच्या दिशेने निघालेली लोकल मुंब्रा स्थानकाजवळ आली असता शेजारुन जाणाऱ्या दुसऱ्या एका लोकलचा काही प्रवाशांना धक्का लागला. त्यावेळी लोकल ट्रेनमध्ये दरवाजात लटकलेले प्रवाशी एक्सप्रेसला घासले. यातून अनेकजण ट्रॅकवर पडून ही दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world