हिंगोली-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 7 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या अपघाताप्रकरणी 25 वर्षीय ट्रॅक्टर चालक नागेश आवटे आणि शेत,विहीर मालक दगडोजी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वतीबाई बुरड या महिलेच्या तक्रारीवरून लिंबगांव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दगडोजी लक्ष्मणराव शिंदे यांचे शेतातील विहिरीला कठडा बांधलेला नसताना व विहिरीजवळून जाण्यासाठी रस्ता नाही याची जाणीव असताना देखील ट्रॅकटर चालकाला जाण्याचे सांगितले. तर ट्रॅक्टर चालक नागेश आवटे याने 10 मजुर बसवून जात ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवून जाणीवपुर्वक सदरचे ट्रॅक्टर मजुरासहीत पाण्याने भरलेल्या विहीरीत टाकुन अपघात घडवून आणला. गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
(नक्की वाचा- कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा; एका चुकीमुळे आरोपीचं बिंग फुटलं)
या अपघातात ताराबाई सटवाजी जाधव, धुरपताबाई सटवाजी जाधव, सिमरन संतोष कांबळे, सरस्वती लखन बुरड, चौत्राबाई माधव पारधे, सपना उर्फ मिना राजु राऊत, ज्योती ईरबाजी सरोदे यांचा बुडून मृत्यू झाला. तर पार्वतीबाई राम भुरड, पुरभाबाई संतोष कांबळे, सटवाजी जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे.
(नक्की वाचा : नणंदेचं 'ते' प्रकरण उघड केलं म्हणून नवरा संतापला, बायकोच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवला आणि...)
मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, "नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल", अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.