
Jailndar Supekar Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातून आता पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर हे नाव चर्चेत आले आहे. हगवणे कुटुंबाचे मामा असलेले तुरुंग विशेष महानिरीक्षक राजेंद्र सुपेकर यांनी हगवणे पुत्रांना बनावट कागदपत्रांवर शस्त्र परवाना दिल्याचा आरोप झाल्यानंतर आता त्यांचे नवनवे घोटाळे उघडकीस येत आहेत. याचबाबत आता स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच विजय कुंभार यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत सुपेकर यांच्यावर आरोप?
1. वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकर यांनी बनावट कागदपत्रांवर शस्त्र परवाना दिल्याचा आरोप आहे;
2. जालिंदर सुपेकर यांनी नाना गायकवाड या कैद्याकडे जामिनासाठी 550 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप वकील निवृत्ती कराड यांनी केला आहे.
3. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर सातत्याने पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.
4. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनीही जालिंदर सुपेकरवर तब्बल 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. राजू शेट्टी यांच्या मते, 2023 ते 2025 या कालावधीत राज्यातील कारागृहांसाठी रेशन, कॅन्टीन साहित्य आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, जो 500 कोटींच्या घरात आहे.
5. जालिदंर सुपेकर यांच्या त्रासाला कंटाळून एका अशोक साबरे नावाच्या पीएसआयने आत्महत्या केली. जालिंदर यांच्या मानसिक छळाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याची चिठ्ठीही त्यांनी लिहली होती, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
6. जालिंदर सुपेकर हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांसाठी लाखो रुपये घेत होते असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे.
7. जालिंदर सुपेकर यांनी कैद्यांच्या दिवाळी फराळातही मोठा भ्रष्टाचार केला. निकृष्ठ दर्जाचा फराळ देत कोट्यवधी रुपये लाटले असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे.
8. कैद्यांना त्यांनी लोकल काजूकतली खायला घातली आणि 1200 रुपये किलोची चांगल्या दर्जाची काजूकतली दिल्याचे बील बनवले, हा घोटाळा 500 कोटींपेक्षा अधिक मोठा आहे, असा दावाही राजू शेट्टी यांनी केला आहे.
9. जळगावमध्ये असताना जालिंदर सुपेकर यांनी अशोक सादरे या पोलीस अधिकाऱ्याकडून वारंवार पैशाची मागणी केली. प्रत्येक दिवाळीला ते प्रत्येक पीआयकडून एक तोळे सोने घ्यायचे, असा खळबळजनक आरोपही असे आरोपही अंजली दमानियांनी केलेत.
Baramati Crime: जीमसमोर उभी क्रेटा कार, पोलिसांना संशय आला अन्.. बारामतीत सर्वात मोठी कारवाई
जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होत असताना सरकारकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा चौकशी होत नाही. कारागृहातील भ्रष्टाचार आणि सुपेकर यांच्या कथित सहभागाची चौकशी तीन महिन्यांपासून का रखडली आहे? सुपेकर यांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेतल्या, पण त्यांना निलंबित का केले नाही? सरकारला काय लपवायचे आहे? सुपेकर यांचा मेहुणा शशांक चव्हाण याला गुन्हे दाखल असताना बढती कशी मिळाली? यात सुपेकर यांचा हात आहे का? असे सवालही या सर्वांनी उपस्थित केले आहेत.
याबाबतच विजय कुंभार यांनी थेट राजकारण्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच सुपेकर यांची पुण्यातून बदली होत नव्हती. राजकीय नेत्यांना असे गुन्हेगार हवे असतात. त्यांना राजकीय संरक्षण असल्यामुळेच कोणतीही कारवाई होत नाही, याला अजित पवारही जबाबदार आहेत असा थेट आरोप कुंभार यांनी केले आहेत. . तसेच सुपेकर यांची चौकशी फक्त कागदावर सुरु आहे, प्रत्यक्षात काहीही कारवाई होत आहे, असे आरोप अंजली दमानियांनी केले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world