राकेश गुडेकर, रत्नागिरी
Ratnagiri News : गुहागर तालुक्यातील गिमवी गावाशेजारील एका गावात सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनेने याबाबत गुहागर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली असून, या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सासऱ्याच्या हातून लैगिंक छळाला बळी पडलेल्या महिलेच्या तक्रारीकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष करून दारू धंदा करणाऱ्या सासऱ्याला अटक करण्यास टाळाटाळ करण्याऱ्या गुहागर पोलिसांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तर सासऱ्यावर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या अॅड. सायली दळवी यांनी या विनयभंग प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना पोलीस स्थानकात जाऊन जाब विचारला. तसेच विनयभंग प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर जी कलमे लावणे आवश्यक होती, ती कलमे लावली नाहीत. त्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर केले तर त्याला लगेच सोडले जाईल. अशा पद्धतीची साधी कलमे लावून त्या गुन्हेगारावर पोलीस यंत्रणा अतिमेहरबान असल्याचं आरोप त्यांनी यावेळी केला.
( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना एका 22 वर्षीय विवाहितेवर सासराच अतिप्रसंग करत असेल आणि आरोपीला पोलीस निरीक्षक सावंत खतपाणी घालत असतील तर तालुक्यातल्या महिला कशा सुरक्षित राहतील, असा सवाल त्यांनी केला. पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल होऊन सुद्धा तीन दिवस झाले तरी आरोपीला अटक करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
( नक्की वाचा : Love Affair : 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली शिक्षिका, नवरा आणि 3 मुलांना सोडलं, वाचा पुढे काय झालं.... )
पोलीस वैष्णवी हगवणे होण्याची वाट पाहताय का?
इतकी मोठी घटना घडली असताना तुम्ही तिची वैष्णवी हगवणे होण्याची वाट पाहत होता का? असा सवाल अॅड. दळवी यांनी केला. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिच्या मागे उभा आहे. तसेच पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्याविरोधात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.