Kolhapur News : मुश्रीफांना शेतकरी फसवणूक प्रकरणात दिलासा, अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाचा आदेश

सरसेनापती  संताजी घोरपडे या कारखान्यातील शेअर्स देण्याचा आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणानंतर ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आलेली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News : मंत्री हसन मुश्रीफ यांना एका घोटाळ्याप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. मुश्रीफ यांच्या विरोधातील एका घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी कागल न्यायालयात सी समरी रिपोर्ट सादर केलेला अशी माहिती वकिलांकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाने मंत्री मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द व्हावा यासाठी केलेली याचिका निकाली काढली.

( नक्की वाचा : BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा )

सरसेनापती  संताजी घोरपडे या कारखान्यातील शेअर्स देण्याचा आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणानंतर ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आलेली. 

काय नेमकं हे प्रकरण होत?

 2023 मध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आलेली. विवेक कुलकर्णी आणि काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात फसवणूक केल्याची ही तक्रार होती. ईडीने या संपूर्ण प्रकारानंतर तपास देखील केला. याच प्रकरणात आता मंत्री हसन मुश्रीफ हे सही सलामत सुटलेत असेच म्हणावे लागेल. 

( नक्की वाचा : Pune Metro : पुणेकरांचा प्रवास होणार आणखी फास्ट, मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी )

कुलकर्णी आणि काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, 2012 मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी भाग भांडवल घेतलेले होते. प्रत्येकी दहा हजार रुपये हे भाग भांडवल असल्याच तक्रारीत म्हटल आहे.

Topics mentioned in this article