लक्ष्मण सोळुंके, जालना
जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. जिल्ह्यात 34 कोटी 97 लाख रुपयांच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीच्या तपासात समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समितीच्या तपासात 26 कर्मचारी हे दोषी आढळले असून अंबड तालुक्यातील 15 तर घनसावंगी तालुक्यातील 11 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, या 34 कोटी 97 लाख रुपयांपैकी आतापर्यंत एकूण 5 कोटी 74 लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(नक्की वाचा- Dharashiv News: छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या)
जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन, पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 8 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती.
(नक्की वाचा- शादी डॉटकॉमवर ओळख, CEO असल्याची बतावणी अन्... उच्चशिक्षित तरुणीसोबत धक्कादायक प्रकार)
या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर समितीने आपला अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या प्रकरणी चौकशी समितीने 79 कोटींची रक्कम अक्षेपित काढली होती. त्यापैकी 72 कोटी रुपयांची समितीने चौकशी केली असून 34 कोटी 97 लाख रुपयांची रक्कम अपहारीत असल्याचं या चौकशीत निष्पन्न झालं असल्याची माहिती जालना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.