
शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Bachchu Kadu Protest : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह एकूण 17 मागण्यांसाठी प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात जून पासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळापासून अन्नत्याग गांदोलन सुरू केले आहे. कडूंच्या आंदोलनाच्या पाठीमागे विरोधकांनी एकीची वज्रमुठ आवळली आहे. पण, हे आंदोलन सुरु होऊन सहा दिवस उलटले तरी यावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत मागण्या?
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्यावे, पेरणी ते कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे MREGS मध्ये घेण्यात यावे, युवकांच्या हाताला काम द्यावे, शेतकरी, कामगार, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक आदींच्या 17 मागण्या घेऊन बच्चू कडूंनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आता तीव्रपणे उमटू लागले आहेत. कडूंच्या समर्थनार्थ प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाळून घेत कुठे अर्ध दफन आंदोलन केले. तर कुठे जलसमाधी, सरकारी कार्यालयांचा ताबा, तर कुठे चक्क अंगावरचे कपडे काढून तहसीलदारांना भेट, जाळपोळ, चक्काजाम, रास्तारोको अशी विविध आंदोलने सध्या राज्यात सुरु आहेत.
( नक्की वाचा : Bachchu Kadu Protest : बच्चू कडू आणि सरकारची बोलणी फिस्कटली, संजय राठोड यांच्यासमोर काय घडलं? )
बच्चू कडूंच्या सहाव्या दिवसाच्या आंदोलनापर्यंत मंत्री भरत गोगावले, पंकजा मुंडे, गणेश नाईक यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. बच्चू कडू यांच्या 17 पैकी 7 मागण्यांवर आत्तापर्यंत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या आंदोलनाला 20 आमदार, सहा खासदार, 120 संघटनांकडून आतापर्यंत पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. सत्ता पक्षात सहभागी असलेले अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके आणि अमरावतीच्या आमदार सुलभा खुडके यांनीही बच्चू कडू यांना पाठिंबा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world