Eknath Shinde : राक्षसाचा जीव पोपटात, तसा यांचा जीव BMC.... एकनाथ शिंदेंनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग

Eknath Shinde Speech : शिवसेच्या 59 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंना जोरदार लक्ष्य केले.
मुंबई:

Eknath Shinde Speech : शिवसेच्या 59 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेंचा सामना हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी आहे. त्यामुळे या भाषणातही शिंदे यांनी प्रामुख्यानं ठाकरे यांना लक्ष्य केलं.

आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे....

19 जून 1966 रोजी वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. लाडक्या शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आहे. आज दुसराही कुठतरी मेळावा सुरु आहे. पण, हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. 

Advertisement

बाळासाहेंबाच विचार आपण जीवापाड जपला. शिवसेनेचं नाव जपलं म्हणून शिवसेनेची घौडदौड सुरु आहे. 2014 साली 282 जागा लढवल्या 63 जिंकल्या. स्ट्राईक रेट 22 टक्के. 2019 साली 124 जागा लढवल्या आणि 56 जागा जिंकल्या. त्यावेळी 45 टक्के स्ट्राईक रेट होता.2024 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. तर उबाठानं 85 जागा लढवल्या आणि 20 जागा जिंकल्या. आपल्या 1/3 मतं ही त्यांना मिळाल्या नाहीत. ज्या जागा जिंकल्या त्या काँग्रेसच्या व्होटबँकेवर जिंकल्या. शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी उबाठाला केव्हाच टाटा-बाय-बाय केले आहे, असा दावा शिंदे यांनी केला. 

Advertisement

( नक्की वाचा : वर्धापनदिनीच वाढलं ठाकरेंचं टेन्शन! खासदार आमच्या संपर्कात, लवकरच... केंद्रीय मंत्र्यांचा दावा )
 

ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार?

बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर केला. त्या काँग्रेसच्या दावणीचं काम कुणी केलं हे आपल्याला माहिती आहे. बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला. मराठी माणसांचा विश्वासघात त्यांनी केला. सरडा रंग बदलतो. पण, इतक्या वेगानं रंग बदलणारा सरडा महाराष्ट्रानं पाहिला. मुख्यमंत्रिपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार?  असा सवाल शिंदे यांनी विचारला.

Advertisement

आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा होणार नाही. हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. ज्यांनी विश्वासघात केला, मतदारांशी बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला वाऱ्यावर उभं राहू देणार नाहीत.

( नक्की वाचा : Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप )
 

आता मराठी माणूस आठवेल. मराठी माणसांच्या नावानं खोटे गळे काढली. बाळासाहेबांनंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलं? याचा हिशेब द्या. तुमच्या नाकार्तेपणामुळे मुंबईतील मराठी माणूस हद्दपार झाला. तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? रामभक्तांना हरामखोर म्हणारे कोण? हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकताना तुमचं हिंदुत्व कुठं होतं? 

जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करणे आणि अयोध्येत राम मंदिर उभारणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांना शिव्या, बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांना ओव्या... हे कसलं हिंदुत्व?

वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही. त्याला वाघाचं काळीज हवं. मनगटात जोर लागतो. तोंडात दम असून चालत नाही मनगटात दम लागतो. तो आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला लागू नका, अशा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.

राक्षसाचा जीव पोपटात...

एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत मुंबईत गाजत असलेल्या मिठी नदीच्या घोटाळ्याही उल्लेख केला. शेतकरी राज्य समृद्ध व्हावं म्हणून ये-रे-ये-रे पावसा म्हणतात. पण उबाठा ये-रे-ये-रे-पैसा म्हणतात. तोच त्यांचा जगण्याचा एकमेव मंत्र आहे. मिठी नदीच्या मगरमिठीतून कुणीही सुटणार नाही. तो कुणीतरी आहे.... दिनू. त्याची चौकशी सुरु आहे. दिनूनं तोंड उघडल्यानंतर किती लोकांचा 'मोरया' होईल ते काही कळणार नाही. 

राक्षसांचा जीव जसा पोटात असतो तसा यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. मुंबईचा लढा चॅम्पियन काही लोकांनी चालवलाय यांना आता मुंबईचा लढा आठवला का? मुंबईत सत्तेत असताना तिजोरी फोडा, आणि सत्तेत नसताना मुंबईचा लढा. लोकांशी लढण्यासाठी घराबाहेर पडलं पाहिजे घरात बसून लढता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्र जिंकलं, महाराष्ट्र जिंकलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. युतीचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधानसभा निवडणुका जिंकल्या म्हणून गाफील राहू नका येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, असं आवाहन शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केला. 
 

Topics mentioned in this article