
Shivsena 59th Anniversary: शिवसेनाचा वर्धापन दिन आज (19 जून) साजरा होत आहे. या निमित्तानं शिवसेनेच्या दोन्ही गटाचे स्वतंत्र कार्यक्रम होत आहेत. उद्धव ठाकरे आजच्या दिवशी राज ठाकरेंशी युती करण्याबाबत काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचवेळी ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'खासदार आमच्या संपर्कात'
उद्धव ठाकरे गटाचे खासदार आमच्या संपर्कात आहेत. भविष्यात उबाठा पक्ष फुटणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेची सर्वात जास्त हवा आहे. उबाठाचे अनेक खासदार शिवेसना एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे भविष्यात सोबत येतील, असा मोठा दावा जाधव यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार अस्वस्थ आहेत. ज्यांना तिथले नेतृत्व मान्य नाही, ते शिंदेसोंबत येतील. त्यासाठी आमचा संपर्क सुरु आहे, असं जाधव यांनी सांगितलं. उबाठा पक्ष संपत आहे. त्या पक्षामध्ये सकाळी उठून फक्त संजय राऊत बोलतात. काम काहीच होत नाही. त्यामुळे आमदार, खासदार अस्वस्थ आहेत, असं जाधव यांनी स्पष्ट केलं. प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यानं शिवसेनेच्या वर्धापन दिनी 'ऑपरेशन टायगर' ची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे ऐन वर्धापन दिनीच उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार आहे.
( नक्की वाचा : Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप )
ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पिछेहाट झाली. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत एकनाथ शिंदे यांनी जोरदार कमबॅक करत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर ठाकरे गटाच्या एकएक नेता आणि कार्यकर्ता आपल्याकडे खेचण्याच धडाका लावला. त्यात आता ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. लोकसभेला शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला सहा खासदार आपल्याकडे खेचणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world