जाहिरात

'भुजबळ चोरट्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष' जरांगे भुजबळांवर पुन्हा घरसले

फडणवीसांनी सध्या सर्व चोरांना एकत्र केले आहे. त्या चोरांचा राष्ट्रीय अध्यक्ष हे छगन भुजबळ आहेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

'भुजबळ चोरट्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष' जरांगे भुजबळांवर पुन्हा घरसले
जालना:

छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादयुद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी मराठ्यांना त्रास झाला तिथे शंभर टक्के हिशोब चुकता केला जाईल असे जरांगे म्हणाले आहेत. फडणवीसांनी सध्या सर्व चोरांना एकत्र केले आहे. त्या चोरांचा राष्ट्रीय अध्यक्ष हे छगन भुजबळ आहेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीसां बरोबरच छगन भुजबळ हे जरांगेंच्या रडारवर असणार हे निश्चित आहे.  

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगे हे विधानसभा निवडणूक मराठा समाजाने लढायची की नाही याची चाचपणी करत आहेत. समाजातल्या लोकांबरोबर ते याविषयी चर्चा करत आहेत. त्यानुसार ते 29 ऑगस्टला निवडणूक लढायची की नाही याबाबत ते निर्णय जाहीर करणार आहेत. मात्र त्यांनी एक भूमिका स्पष्ट केली आहे. ती म्हणजे ज्या ठिकाणी मराठा समाजाला त्रास झाला त्या ठिकाणी शंभर टक्के  हिशोब चुकता केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्या जागा कोणत्या असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याआधी जरांगे यांनी भाजपच्या उमेदवारांना पाडा असे आवाहन समाजाला दिले होते.

ट्रेंडिंग बातमी -  'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...'

 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता बदल होणार हे निश्चित आहे असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही पाटील यांनी टिका केली आहे. आपण काय बोलत आहोत हे जरांगे पाटील यांना विधानसभा निवडणुकीनंतर समजेल असे राज म्हणाले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की जर सत्ताच बदलणार असेल तर आता बोलून उपयोग काय असे म्हणाले. सध्या जरांगे यांनी समाजातील लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. 

ट्रेंडिंग बातमी -  उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत, ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्वाचा का?

आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो असल्याचे जरांगे यांनी सांगितले. 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान आपण संपुर्ण डाटा गोळा करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर चर्चा करून 29 ऑगस्टला निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान आपल्याला रोज आजी माजी आमदार भेटून जात आहेत. सर्वांना आपण एकत्र घेवून पुढे जाणार आहोत. असं असताना दुसरीकडे फडणवीसंनी मात्र चोरटे एकत्र केले आहेत असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. शिवाय या सर्व चोरट्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मुलाच्या 'कार'नाम्याचा बावकुळेंना फटका, भाजपा श्रेष्ठींनी दिले मोठे 'संकेत'
'भुजबळ चोरट्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष' जरांगे भुजबळांवर पुन्हा घरसले
Indapur Political news dNCP mla attatray bharne statement on mla Harshwardhan patil
Next Article
"...तर हर्षवर्धन पाटलांसाठी जोरात काम करु", अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य