उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकामागून एक धक्के उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देत आहेत. त्यात आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ठाकरेंचे पाच खासदार असल्याचं बोललं जात आहे. पावसाळी अधिवेशना पूर्वी ऑपरेशन टायगर अंतर्गत हे पाचही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्या हे ऑपरेशन टायगर सक्सेस होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. पण त्यात बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावरून ही ठाकरेंना डिवचण्याची संधी सोडलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरबाबत नितेश राणे यांना विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले उद्धव ठाकरे यांचा आणि टायगरचा काही संबंध नाही. ठाकरे गटाचे खासदार फोडायचे असतील तर ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन पेंग्विन करायला हवे. त्यासाठी ऑपरेशन पेंग्विन हेच योग्य नाव असेल, असा टोला नितेश राणे यांनी ठाकरे गटाला लगावला. आता ठाकरेंकडे कुणी राहेलेले नाही. शिवाय त्यांचा आणि टायगरचा काही संबध ही नाही असे ही त्यांनी यातून सुचित केले आहे. शिवाय शिंदेंना जे काही करायचे आहे, ते नक्की करतील असं ही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा आहे. याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ते म्हणाले की जर दोन भाव एकत्र येणार असतील तर ते चांगली गोष्ट आहे. कुठलं ही कुटुंब एकत्र येणार असेल तर ती आनंदाचीच गोष्ट आहे. त्या आपण काय बोलणार. त्यांना वाटलं तर त्यांनी एकत्र आलं पाहीजे असं ही सांगायला राणे विसरले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव राज एकत्र येणार अशी जोरदार चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
सांगोला येथे बसवेश्वर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मंत्री नितेश राणे आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे पाच खासदार फोडायचे असतील तर ऑपरेशन पेंग्विन हे नाव द्या असं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. तसेच राज आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे. यामध्ये किंतू परंतु आणण्याची गरज नाही. असं ही वक्तव्य केलं. शिवाय बकरी ईद निमित्त ही त्यांनी ती कशी साजरी करावी याचाही सल्ला दिला आहे.