
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde NCP Leader ) यांना मार्च महिन्यात विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी (Maharashtra Assembly Session 2025) राजीनामा द्यावा लागला होता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येनंतर मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याने या प्रकरणात मुंडे यांचाही समावेश आहे का ? असा सवाल विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीही उपस्थित केला होता. या सगळ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा डागाळू लागली होती, ज्यामुळे मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
(नक्की वाचा: मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात?)
सतत डोळ्यावर गॉगल कशासाठी?
बीडच्या एका खासगी कोचिंग क्लामध्ये (Beed Coaching Class Student Sexual Harrasment) विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. प्रशांत खटावकर आणि विजय पवार अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपींवर आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात संदीप क्षीरसागर हे आघाडीवर होते. हे प्रकरण गंभीर असून संदीप क्षीरसागर यांच्यावर आता धनंजय मुंडे यांनीही सडकून टीका करण्यास सुरूवात केली आहे. धनंजय मुंडे हे अज्ञातवासातून बाहेर पडले असून सोमवारी त्यांनी याच प्रकरणासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंडे हे डोळ्यावर गॉगल लावूनच संवाद साधत होते. गेल्या काही दिवसांत धनंजय मुंडे हे सतत गॉगल लावूनच फिरताना दिसत आहेत. यामागचे कारण हे अनेकांना माहिती नाहीये.
(नक्की वाचा:धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका ? सहकारमंत्र्यांच्या गौप्यस्फोटानंतर स्वत: मुंडेंनीच सांगितलं सत्य)
आजारामुळे घालावा लागतोय गॉगल
धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सीने (Dhananjay Munde Bell's Palsy) ग्रासले होते. यातून ते बऱ्यापैकी सावरले आहे. सुरूवातीला त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे बोलले जात होते, मात्र स्वता धनंजय मुंडे यांनी आपल्याला अर्धांगवायूचा झटका आलेला नसून आपल्याला बेल्स पाल्सीने ग्रासल्याचे सांगितले होते. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना बेल्स पाल्सीचा त्रास व्हायला लागला. त्याच काळात धनंजय मुंडे यांच्यावर चहूबाजूने टीका होऊ लागली होती. बेल्स पाल्सीमुळे धनंजय मुंडे यांना नीट बोलता येत नव्हते आणि त्याचा त्रास त्यांना आजही काही प्रमाणात होताना दिसतो आहे. बेल्स पाल्सी झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या काही भागावर नीटपणे नियंत्रण राहात नाही. यामुळे त्यांचा एक डोळा बोलताना बंद होतो, ते वाईट दिसत असल्याने धनंजय मुंडे यांनी गॉगल लावण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना ते कटाक्षाने गॉगल वापरताना दिसत आहेत.
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 18, 2025
श्री…
बेल्स पाल्सी हा आजार जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे होऊ शकतो. अचानक थंडी लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, या व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. मधुमेह (डायबिटीज) किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे जेवणात मीठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळेही हा आजार उद्भवू शकतो. मिठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक हे चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघाताचे मुख्य कारण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world