जाहिरात

IPL 2025: IPLच्या पहिल्याच मॅचमध्ये पावसाचे विघ्न! सामना रद्द होणार? असं असेल कोलकाताचे हवामान; वाचा...

IPL 2025 KKR VS RCB Weather Update: पण ईडन गार्डन्समध्ये उत्कृष्ट ड्रेनेज सिस्टम आहे, ज्यामुळे पाऊस थांबल्यानंतर खेळ लवकर सुरू होतो. पण जर पाऊस असाच सुरू राहिला तर सामना रद्द होण्याची शक्यता वाढेल.

IPL 2025: IPLच्या पहिल्याच मॅचमध्ये पावसाचे विघ्न! सामना रद्द होणार? असं असेल कोलकाताचे हवामान; वाचा...

KKR VS RCB IPL 2025: क्रिडा विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या रणसंग्रामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. गतविजेता कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. आयपीएल सुरु होत असल्याने क्रिडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या पहिल्याच लढतीमध्ये पाऊस घोळ असणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यातील 22 मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या सामन्यावर पावसाचा धोका आहे. हवामान खात्याने 20 ते 22 मार्च दरम्यान पाऊस आणि वादळासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण ईडन गार्डन्समध्ये उत्कृष्ट ड्रेनेज सिस्टम आहे, ज्यामुळे पाऊस थांबल्यानंतर खेळ लवकर सुरू होतो. पण जर पाऊस असाच सुरू राहिला तर सामना रद्द होण्याची शक्यता वाढेल.

कोलकाता नाईट रायडर्स यावेळी गतविजेता संघ म्हणून स्पर्धेत प्रवेश करत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली या संघाने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. आता केकेआर आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी संघ बनला आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) प्रत्येकी पाच जेतेपदांसह आघाडीवर आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ; वाहनांनुसार किती टोल भरावा लागणार?

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यावेळी त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल.  या संघाची गोलंदाजी नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे, परंतु यावेळी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडच्या आगमनाने गोलंदाजी आक्रमणाला बळकटी मिळाली आहे. मात्र त्यांच्याकडे फिरकीपटूचा अभाव आहे. कृणाल पंड्या हा मुख्य फिरकी गोलंदाज असेल, पण संघाला अजूनही अशा फिरकी गोलंदाजाची गरज आहे ज्याच्याकडे सामना बदलण्याची क्षमता असेल.

CAN. NOT. WAIT! 🤩

ONLY 1️⃣ Sleep Away 🥳#TATAIPL 2025 is nearly here ⏳ pic.twitter.com/lU533Z64Nu

— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2025

हवामान अंदाज:
भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे, 20 ते 22 मार्च दरम्यान पश्चिम बंगालच्या काही भागात वादळ आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. जर पाऊस जास्त वेळ थांबला नाही तर त्याचा सामन्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे चाहते निराश होतील. आता सर्वांचे लक्ष हवामानावर असेल जेणेकरून आयपीएलची पहिली लढत कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू होऊ शकेल.