Mumbai Indians in Action : पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून या सिझनमध्ये त्यांच्या फॅन्सना मोठ्या अपेक्षा होत्या. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबईने सलग सहा सामने जिंकून प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले. मात्र, क्वालिफायर-२ मध्ये पराभव झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएलमधील दिग्गज फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएल 2020 नंतर आजवर आयपीएल विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या हंगामातील कामगिरीबद्दल मुंबईच्या गोटात निश्चितच कुजबुज सुरू आहे आणि व्यवस्थापन गंभीर आढावा घेण्याच्या मनस्थितीत आहे. अशा परिस्थितीत, पुढील हंगामापूर्वी टीम मॅनेजमेंट पाच प्रमुख खेळाडूंना करारातून मुक्त करु शकते.
रोहित शर्मा
या यादीमधील पहिलं मोठं नाव आहे, रोहित शर्मा. मुंबईच्या मॅनेजमेंटसाठी आता ती वेळ आली आहे. रोहित मुंबईचा सर्वात मोठा स्टार आहे. पण, गेल्या काही सिझनपासून त्याच्या कामगिरीमधील अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सिझनमध्ये बहुतेक सामन्यात तो 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून खेळला. त्यामुळे मॅनेजमेंटने रोहितला रिलीज करण्याचा रिलीज करण्याचा निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.
( नक्की वाचा : रोहित शर्माच्या विकेटनंतर सेलिब्रेशन का केलं नाही? मोहम्मद सिराजचं उत्तर वाचून वाटेन अभिमान! )
रॉबिन मिंझ
या युवा विकेटकिपरनं स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती, त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सनं खरेदी केलं होतं. पण, तो आपले स्थान पक्के करू शकला नाही. रॉबिनने दोन सामन्यांत फक्त 6 रन्स केले. त्याचा स्ट्राईक रेट 40 च्या खाली होता. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक चांगले पर्याय उपलब्ध असल्याने, व्यवस्थापन पुढील हंगामापूर्वी त्याला रिलीज करू शकते.
मिचेल सँटनर
न्यूझीलंडच्या सँटरनरला त्याच्या ऑलराऊंड क्षमतेमुळे टीममध्ये घेण्यात आले होते. पण तो 13 मॅचमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. सँटनरने 8.25 च्या इकॉनॉमी रन-रेटने 10 विकेट्स घेतल्या आणि फक्त 56 रन्सचे योगदान दिले. आता मुंबईचे लक्ष स्पिन बॉलिंग मजबूत करण्यावर आणि अधिक ऑलराऊंडर घेण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे पुढील सिझनपूर्वी सँटनरला टीममधून बाहेर काढले जाऊ शकते.
( नक्की वाचा : Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले )
तिलक वर्मा
तिलक वर्मा हा भविष्यातील खेळाडू आहे यात शंका नाही, पण या सिझनमध्ये त्याने 11 इनिंगमध्ये 16.18 च्या सरासरीने फक्त 178 रन्स केले. रन्सचा पाठलाग करताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यामध्ये तो अपयशी ठरला. या अपयशाचा मुंबईच्या मिडल ऑर्डरला फटका बसला. त्यामुळे तिलक वर्माचीही टीममधून हकालपट्टी होऊ शकते.
दीपक चहर
फिट होऊन परतलेल्या चाहरकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, तो 11 मॅचमध्ये फक्त 14 विकेट्स घेऊ शकला. त्याचा इकॉनॉमी रन-रेट देखील 9.1 पर्यंत गेला. तो संघाला पॉवर-प्लेमध्ये विकेट्स मिळवून देऊ शकला नाही, तर अनेक मॅचमध्ये डेथ ओव्हर्समध्ये खूप महागडा ठरला. त्यामुळे व्यवस्थापन चहरच्या जागी दुसऱ्या खेळाडूला प्राधान्य देण्याचा विचार करत आहे, असे संकेत मिळत आहे.