जाहिरात

'ले ले प्‍लेट, भाड़ में गया बिरयानी', रवी शास्त्रींनी डिवचताच शमी संतापला! त्यानंतर मैदानात आलं वादळ, Video

Ravi Shastri taunts Mohammed Shami : रवी शास्त्रींनी मोहम्मद शमीला डिवचल्यानंतर मैदानात शमीचं वादळ आलं.

'ले ले प्‍लेट, भाड़ में गया बिरयानी', रवी शास्त्रींनी डिवचताच शमी संतापला! त्यानंतर मैदानात आलं वादळ, Video
Mohammed Shami : मोहम्मद शमीचं बिर्याणी प्रेम सर्वांनाच माहिती आहे.
मुंबई:

Ravi Shastri taunts Mohammed Shami : मोहम्मद शमीनं त्याच्या स्फोटक स्पेलच्या जोरावर टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलं आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी शमीबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. शमीला डिवचल्यानंतर त्याचा राग मैदानातील कामगिरीत दिसतो, असं शास्त्रींनी सांगितलं. शास्त्री यांनी शमीला डिवचलं होतं. त्यानंतर शमीानं एक जबरदस्त स्पेल टाकला आणि टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये विजय मिळाला, असं शास्त्रींनी सांगितलं. शास्त्री, शमी आणि बिर्याणी यांचा तो किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शास्त्री, शमी आणि बिर्याणी

टीम इंडियानं 2018 साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यातील तिसऱ्या टेस्टमध्ये ही घटना घडली. आफ्रिकेनं पहिल्या दोन टेस्ट जिंकून सीरिज दिंकली होती. तिसरी टेस्ट जिंकण्यासाठी  शेवटच्या दिवशी लंचनंतर आफ्रिकेला 100 पेक्षा कमी रन्सची गरज होती. आफ्रिकेच्या सात विकेट्स शिल्लक होत्या. 

रवी शास्त्री यांनी लंच टाईममध्ये शमी एका मोठ्या प्लेटमध्ये बिर्याणी खात पाहिलं. त्यांनी शमीला त्यावर चिडवायला सुरुवात केली. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शास्त्रींनी सांगितले, 'ती मॅच चांगलीच टफ होती. दुपारच्या जेवणाच्या वेळी मी जात असताना, मी शमीची प्लेट पाहिली. त्याच्या प्लेटमध्ये ढिगभर बिर्याणी होती. 

( नक्की वाचा : IND vs ENG : टीम इंडियाला धोका! राहुलला आऊट करणाऱ्या 6 फुट 4 इंच बॉलरचा इंग्लंडनं केला समावेश )
 

टीम इंडियाचे तत्कालीन बॉलिंग कोच भरत अरुण यांनी सांगितले की, शास्त्रींनी शमीला चिडवत विचारले, 'तेरा भूक इधर ठीक हो गया क्या? (तुझी भूक इथेच भागली की काय?)'.

शमीने शास्त्रींना रागाने उत्तर दिले आणि बिर्याणी खाण्यास नकार दिला. शास्त्रींनी सांगितल्यानुसार, शमीने उत्तर दिले, 'ले ले प्लेट. नही चाहिए बिरयानी (प्लेट घे. नकोय बिर्याणी). बिर्याणी नरकात जाऊ दे.' यानंतर शास्त्री अरुणकडे गेले आणि त्यांना शमीला चिडलेला राहू दे असं सांगितले.

शास्त्रींनी अरुणला सूचना दिली, 'तो रागावला आहे. त्याला तसेच राहू द्या. जर त्याला तुमच्याशी बोलायचे असेल, तर त्याला सांगा की काही विकेट्स घेऊन मग बोलावे.'

मैदानात शमीचं वादळ

मोहम्मद शमीनं त्यानंतर सर्व राग मैदानातील बॉलिंगमध्ये काढला. त्यानं पुढील सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या मिडल आणि लोअर ऑर्डरला खिंडार पाडले. त्यानं 28 रन्समध्ये 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने ती टेस्ट 63 रन्सनं जिंकली. या विजयात शमीची भूमिका महत्त्वाची होती. 

अरुण यांनी स्पष्ट केले, 'रागावणे ही एक गोष्ट आहे, पण त्या रागाचा बॉलिंगमध्ये योग्य प्रकारे वापरणे ही दुसरी गोष्ट आहे." गंमतीशीर गोष्ट म्हणजे, मॅचनंतर भरत अरुणने शमीला बिर्याणी देऊ केली, त्यावर शमीने उत्तर दिले, 'पहिल्यांदा तुम्ही मला रागावाल आणि मग सर्व काही ठीक होईल.'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com