महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या 'रेस्पिफ्रेश टीआर कफ सिरप'चा साठा बीड जिल्ह्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सिरपमुळे मध्य प्रदेशात 20 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला होता. बीडमध्ये या सिरपच्या 500 बाटल्या मिळाल्या आहेत. औषध प्रशासनाने या प्रकरणी तातडीने तपास सुरू केला आहे.