मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या निर्णयावरून सध्या वादंग सुरू असताना, राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. कबुतरांमुळे होणारे आरोग्याचे धोके मान्य करत, त्यांनी पर्यायी जागांचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.