दरम्यान उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट ठेवली. मनसेनं शिंदे आणि भाजपसोबत राहू नये, पाठिंबा आणि छुपा प्रचार करु नये अशी अट घातली. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. हा फक्त निवडणुकीपुरता विषय नाही, मराठीच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र यावं असं संदीप देशपांडे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अटीवर मनसे बगल देतंय का? असा चर्चा सुरु झाल्यात.