जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर आता गंगाधर काळकुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परवानगीची मागणी केलीय.. “अमृता फडणवीस यांनी माझे भाऊ मनोज जरांगे हे मुंबईत शांततेत आंदोलन करतील, असं म्हटलं होतं... मग आम्हीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत,” असं काळकुटे म्हणालेत.. मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे दाजी आहेत, त्यामुळे ते आंदोलनाला परवानगी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय..