Man Quit Rs 26 Lakh Job: मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असते. अशी भरगच्च पगाराची नोकरी सोडताना हजारदा विचार करायला लागतो. मात्र एका भारतीय तरुणाने तब्बल 26 लाख वार्षिक पगार असलेली नोकरी जॉईनिंगच्या आधीच सोडून दिली. सोशल मीडियावर स्वतः या तरुणाने त्याच्या या निर्णयाबद्दल पोस्ट केली ज्यावर नेटकऱ्यांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बापरे! 26 लाखांची नोकरी सोडली
समोर आलेल्या माहितीनुसार, पुष्कर नावाचा हा तरुण वेबसाइट डिझायनर म्हणून काम करतो. त्याने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत त्याच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. त्याने लिहिले की काही दिवसांपूर्वी, ऑनबोर्डिंग दरम्यान मी ₹२.६ दशलक्ष वार्षिक (LPA) पगाराची नोकरी सोडली. तेव्हापासून माझ्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत. काहीवेळा हा निर्णय योग्य आहे असं वाटत, कारण मला नोकरीत अडकून राहायचं नव्हतं. तर दुसऱ्या बाजूने माझा हा निर्णय चुकीचा असल्याचे वाटते.
पुढे तो म्हणतो की, मोठ्या शहरांमध्ये दर महिन्याला २.१ लाखाची नोकरी म्हणजे जास्त वाटत नसले तरी त्याच्यासाठी ही मोठी रक्कम होती. मी मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून येतो. तिथे महिन्याला २०,००० ते ३०,००० रुपयांचा पगार देखील जास्त वाटतो, त्यामुळे इतक्या मोठ्या पगाराची नोकरी सोडणे त्याच्यासाठी थोडे धाडसी होते.
पुष्करने असेही स्पष्ट केले की तो सध्या फ्रीलांसर म्हणून काम करतो, जे पूर्णपणे स्थिर नाही. कधीकधी खूप काम असते, कधीकधी कमी. तरीही, त्याला वाटते की जर तो त्या नोकरीवर रुजू झाला असता तर त्याला दररोज पश्चात्ताप झाला असता. "मला एक गोष्ट निश्चितपणे माहित आहे. जर मी त्या नोकरी केली असती तर तर मला दररोज पश्चात्ताप झाला असता. म्हणून मी माझ्या मनाचे ऐकले आणि हा निर्णय घेतला. मला आशा आहे की हा निर्णय भविष्यात योग्य ठरेल.
A few days ago, I walked away from a ₹26 LPA job right at the time of onboarding.
— Pushkar @ Website Designer (@in_pushkar) March 5, 2026
Since then I've had very mixed feelings.
One side of me says I made the right decision. I didn't want to get trapped in a job.
The other side keeps asking… what if this was a huge mistake?…
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक लोकांनी पुष्करच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले. एका वापरकर्त्याने लिहिले की खरी प्रगती बहुतेकदा आरामदायी जीवन सोडून स्वातंत्र्य निवडल्याने होते. दुसऱ्या युजरने म्हटले की जोखीम घेणे ही मोठ्या यशाची सुरुवात असू शकते. काही नेटकऱ्यांनी सांगितले की, प्रत्येकाच्या प्राधान्यक्रम वेगवेगळ्या असतात. काहींना स्थिर नोकरीची किंमत असते, तर काहींना स्वातंत्र्य आणि स्वतःचे निर्णय महत्त्वाचे असतात. म्हणूनच, कोणताही मार्ग योग्य किंवा अयोग्य असे वर्गीकृत करणे कठीण आहे, कारण शेवटी, निर्णय व्यक्ती जीवनात सर्वात जास्त काय महत्त्व देते यावर अवलंबून असतो.
US Israel Iran War : तेल, गॅसपाठोपाठ आता थेट पाण्यावर 'वार'; तीव्र पाणीसंकट निर्माण होण्याची भीती
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world