जाहिरात

Iran-Israel Conflict : इराण दाबणार जागतिक तेलपुरवठ्याची मान? भारतामध्ये निर्माण होणार भयंकर परिस्थिती!

Strait of Hormuz : इराणच्या हद्दीतील ही सामुद्रधुनी म्हणजे जगाला खनिज तेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा करणाऱ्या मध्य आशियातील देशांची मान आहे.

Iran-Israel Conflict : इराण दाबणार जागतिक तेलपुरवठ्याची मान? भारतामध्ये निर्माण होणार भयंकर परिस्थिती!
Strait of Hormuz : इराणनं हे अस्त्र काढलं तर त्याचा भारतावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
मुंबई:

Iran-Israel Conflict : इराण आणि इस्रायल या पश्चिम आशियातील दोन लष्करी सत्तांमधील संघर्ष सध्या चांगलाच चिघळला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. इराणची राजधानी तेहरामधील अनेक इमारती गेल्या चार दिवसात जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात  तेहरानसह इतर शहारांमध्ये अक्षरशः हाहाःकार उडलाय.

इराणनंही इस्रायलच्या राजधानीवर हल्ले करुन त्याला प्रत्युत्तर दिलंय..अनेक क्षेपणास्त्र, ड्रोनच्या हल्ल्यांनी इस्रायलची तेल अव्हिव, हायफा आणि इतर काही शहरं सध्या दहशतीत आहेत. दोन्ही देश आपापल्या संपूर्ण शक्तीनिशी संघर्षात उतरलेत. पण असं एक अस्र आहे जे इराणनं अजून त्यांच्या भात्यातून बाहेर काढलेलं नाही. हे अस्त्र इराणनं बाहेर काढलं तर जगभर हाहाकार माजू शकतो. विशेषत: भारतावर याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे इराणचं अस्त्र ? (strait of hormuz importance)

इराणचे लष्करी अधिकारी मोहसेन रियाझी यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत इशारा दिला होता. आमच्याकडे काही अशी अस्त्र आहेत, की जी जगाला माहिती नाहीत, असा इशारा रियाझी यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर जगाची चिंता वाढली आहे. कारण, एक अस्र आहे जे इराणनं अजून त्यांच्या भात्यातून बाहेर काढलेलं नाही.  ते अस्त्र आहे हरमुझची सामुद्रधुनी...

इराणच्या हद्दीतील ही सामुद्रधुनी म्हणजे जगाला खनिज तेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा करणाऱ्या मध्यआशियातील देशांची मान आहे. ओमान, सौदी अरेबिया आणि  इराण या तीन देशांना जोडणारी ही सामुद्रधुनी आहे. 33 किलो मीटर लांब या सामुद्रधुनीतून सौदी अरेबिया, ओमानची हजारो जहाजं रोज वाहतूक करतात.

( नक्की वाचा : Iran-Israel conflict : '.... तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल',युद्ध चिघळणार? )
 

जगाच्या एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी 23 टक्के कच्च्यातेलाची वाहतूक याच सामुद्रधुनीतून होते. या समुद्रधुनीतून रोज 2.1 कोटी बॅरल कच्चं तेल आणि 8 कोटी टन नैसर्गिक गॅसची वाहतूक होते.

भारतालाही मोठा फटका? 

हरमुझची सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारत आपल्या एकूण गरजेच्या 88 टक्के खिनीज तेल आयात करतो. त्याच्या दोन तृतीअंश कच्चं तेल याच सामुद्रधुनीमार्गे येतं. त्यामुळे इराणनं हा मार्ग बंद केला तर त्याचा फार दुहेरी झळ भारताला बसू शकते.

( नक्की वाचा : इराणमध्ये Live प्रसारणच्या दरम्यान इस्रायलचा बॉम्बवर्षाव, बातम्या सांगताना अँकर पळाली, पाहा Video )
 

गेल्या पाच दिवसात युद्धाची जी स्थिती निर्माण झालीय, ती बघता  इस्रायलसोबतचा वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे  हार्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा विचार इराणमध्ये सुरु असेलल्याची चर्चा  सुरु झाली आहे. इराणनं हे पाऊल उचचलं तर मात्र युद्धाचे मोठे आणि दीर्घकालीन परिणाम भारतासह सर्वांनाच भोगावे लागतील.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com