जाहिरात
Story ProgressBack

मूर्खपणा बंद कर! म्हणत पहिल्या पत्नीने आमीर खानच्या लगावली होती कानशिलात, कारण...

Aamir Khan: नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने हजेरी लावली होती. यावेळेस त्याने पहिली पत्नी रीना दत्तशी संबंधित एक किस्सा प्रेक्षकांना सांगितला.

Read Time: 3 min
मूर्खपणा बंद कर! म्हणत पहिल्या पत्नीने आमीर खानच्या लगावली होती कानशिलात, कारण...

Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये नुकतीच हजेरी लावली. यावेळेस कार्यक्रमामध्ये आमीरच्या बहिणी निखत आणि फरहत या देखील सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या या एपिसोडमध्ये आमीर खानने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक भन्नाट किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले. यापैकीच एक किस्सा आमीरची पहिली पत्नी रीना दत्तशी संबंधित होता. रीना दत्तने मुलगा जुनैद खानच्या जन्माच्या वेळेस थेट कानशिलात लगावल्याचा किस्सा आमीरने शोमध्ये सांगितला.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कपिल शर्माने आमीर खानला नेमका कोणता प्रश्न विचारला?

कॉमेडियन कपिल शर्माने आमीर खानला त्याच्या लोकांच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्याच्या सवयीबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना आमीरने मुलगा जुनैद खानच्या जन्मादरम्यान घडलेली एक गंमतीशीर घटना चाहत्यांना सांगितली.

(नक्की वाचा: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानला अटक, 40 तास पोलीस करत होते पाठलाग)

रीना दत्तला प्रसूतीकळा सुरू होत्या, अन्...  

आमीर खानने सांगितले की, रीनाला प्रसूतीकळा सुरू होत्या आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. तेव्हा एक चांगला पती म्हणून मी तिला शांतपणे श्वासोच्छवास घेण्यास सांगितले. जसजसे प्रसूतीकळा वाढत होत्या, तसे मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिने अचानक माझ्या कानशिलात लगावली आणि म्हटले, 'हा मूर्खपणा बंद कर!' त्यावेळेस रीनाला खूप वेदना होत होत्या. तिने माझ्या हाताचा चावा देखील घेतला होता". 
 

आपल्या जीवनातील भावनिक क्षणाबाबत बोलताना आमीर खान पुढे  म्हणाला की, "माझ्या आजूबाजूला काय घडत आहे, याची जाणीव मला थोड्या वेळाने झाली. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अतिशय तीव्र स्वरुपातील वेदना होत असतात, उदाहरणार्थ महिलांना प्रसूतीच्या वेळेस वेदना होतात. तेव्हा आपण विचार करतो की एखाद्या व्यक्तीचा चेहरा वेदनांमुळे चित्रविचित्र दिसत आहे. पण सहनशक्तीच्या पलिकडील त्रास होऊ लागला की आश्चर्याच्या धक्क्याप्रमाणे चेहऱ्यावर हावभाव दिसू लागतात. संबंधित व्यक्ती याचा स्वीकार करू शकत नाही. रीना देखील तिला होणाऱ्या वेदनेची तीव्रता समजू शकली नाही, हे माझ्या लक्षात आले". 

(नक्की वाचा:  तारक मेहता का उल्टा चश्मामधील सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, सोशल मीडियावरील शेवटचे पोस्ट चर्चेत)

16 वर्षांनंतर आमीर-रिना झाले विभक्त

आमीर खान आणि रीना दत्त यांनी 16 वर्षे संसार केला आणि त्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय केला. जुनैद खान आणि इरा खान अशी त्यांच्या मुलांची नाव आहेत. रीना दत्तशी घटस्फोट घेतल्यानंतर आमीरने चित्रपट निर्माती किरण रावशी लग्न केले, त्यांना देखील एक मुलगा आहे. आमीरने किरणसोबतही लग्नाच्या 15 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. पण दोघंही एकत्रितपणे मुलाचा सांभाळ करत आहेत. 

VIDEO: शेतकऱ्याचा मुलगा JEE परीक्षेत अव्वल, नागपूरच्या मुलाने नाव काढलं 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination